कोरेगांव : आपल्या महाराष्ट्रातील सातारा सांगली व कोल्हापूर हे जिल्हयातील लोकांचे या महापुराने फार मोठे जिवीत व वित्त हानी झाली असल्याने तेथील लोकांचे होत्याचे नव्हते झाले आहे. अशा परिस्थितीत त्यांना आधार देण्याचे काम महाराष्ट्रातील जनता व अनेक संस्था मानुसकीच्या भावनेने धावून आली आहे. लहान मोठे गांव वा शहर सर्वंच जण मदतीसाठी सरसावले आहेत. कोरेगांव शहरचे वतीने पुरग्रस्तांसाठी निधी व जीवनावश्यक सामान गोळा करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू असून त्यासाठी जनतेला मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.
या आवाहनास प्रतिसाद देण्याचे काम प्रत्येकाचे असून प्रत्येकजन आपापल्या कुवतीने मदतीचा हात पुढे करीत आहे. कोरेगांवातील डॉ. मिरदेव गायकवाड वाचनालय व कोरेगांव शहर विकास मंचचे वतीनेही कोणत्या सामानाची कमतरता आहे. याची चौकशी करून मंचचे अध्यक्ष किशोर बर्गे यांचे वतीने पुरग्रस्तांसाठी निधी व जीवनावश्यक साहित्य व सामान गोळा करणार्या कोरेगांव चौथाई येथील कार्यकर्त्यांकडे चहापुडयांचा साठा जमा केला.
यावेळी पुरग्रस्तांसाठी निधी व जीवनावश्यक साहित्य व सामान गोळा करणारे कोरेगांव चौथाई येथील कार्यकर्ते विकास बर्गे, बाळासाो बर्गे, हर्षल जोशी, भानुदास सुतार, सुरेश शिंदे, जगदिश पवार, राहुल चव्हाण, पार्थ वेळापुरे व प्रतिक वेळापुरे हेमंत बर्गे बा. दि. बर्गे श्री. वेळापूरे सर, बाळासाहेब साळुंखे, कार्याध्यक्ष दिलीपराव बर्गे, व कोरेगांव शहरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
प्रत्येक गावांतुन पुरग्रस्तांना जाणार्या मदतीने माणसातील देव दिसून येतोय : किशोर बर्गे
RELATED ARTICLES