सातारा: लिंब आणि राजघराणं याचं एक अतूट आणि आपुलकीच नातं आहे. लिंब गावच महाराजांचं आहे. शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून लिंबमध्ये अनेक विकासकामे झाली आणि यापुढेही होणार आहेत. मागच्या निवडणुकीपुरते उगवलेले दीपक पवार याही निवडणुकीत उगवले आहेत. पाच वर्ष पवार तुम्ही कुठे गायब होता? असा खोचक सवाल करतानाच लिंब गावातून दोन्ही राजेंच्या कमळालाच मताधिक्य मिळेल असा निर्धार लिंब येथील महिला मेळाव्यात ग्रामस्थांनी केला.
भारतीय जनता पार्टी, शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे सातारा लोकसभा पोटनिवडणूकीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले आणि सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ लिंब येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास श्रीमंत छ.सौ.वेदांतिकाराजे भोसले, श्रीमंत छ.सौ. दमयंतीराजे भोसले, नीता केळकर, कांताताई नलावडे, सुवर्णा पाटील, चंद्रलेखा माने कदम, मिसेस मुख्यमंत्री फेम सुमी, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेरमन सर्जेराव सावंत, राजू शेटे, प्रदीप पाटील, पं.स.उपसभापती जितेंद्र सावंत, जि.प.माजी सदस्य बाळासाहेब गोसावी, प्रदीप वंजारी, अण्णाबापू सावंत, सरपंच अनिल सोनमळे, उपसरपंच उज्वला शिंदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
सौ.वेदांतिकाराजे म्हणाल्या, दर पाच वर्षानंतर निवडणूक लागली की विरोधकांची पिकनिक चालू होते आणि मतदानाद्वारे जनता त्यांना घरी पाठवते. त्यामुळे लिंब ग्रामस्थांनी उपस्थित केलेला सवाल खूप महत्वाचा आहे. निवडणुकीपुरते घिरट्या घालणार्यांनी आजपर्यंत जनतेसाठी काय केलं हाही महत्वाचा प्रश्न आहे. शिवेंद्रराजेंनी काय केलं हे जनतेला माहिती आहे आणि शिवेंद्रराजे स्वतःही सांगत आहेत. त्यामुळे शिवेंद्रराजेंनी काय केलं यापेक्षा विरोधकांनी आजवर काय केलं हे एकदा सांगण्याच धाडस दाखवावं, असे आव्हान सौ. वेदांतिकाराजे यांनी दिले. सौ. दमयंतीराजे म्हणाल्या, दोन्ही राजेंच्या माध्यमातूनच विकासकामे होणार आहेत. गतिमान विकास व्हावा यासाठीच दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आम्ही दोघींनी दोन्ही राजे एकत्र येण्यासाठी खूप प्रयत्न केले त्याला आज यश आले असून आता दोघे कायम एकत्र राहतील आणि संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट करतील. त्यासाठी सर्वांनी कमळा समोरील बटन दाबून आपल्या लाडक्या राजेंना विजयी करा, असे आवाहन सौ. दमयंतीराजे यांनी केले.
यावेळी कांताताई नलवडे, सौ. पाटील, बाळासाहेब गोसावी, सर्जेराव सावंत आणि मान्यवर महिला व ग्रामस्थांनी मनोगत व्यक्त करून दोन्ही राजेंना मताधिक्य देण्याचा निर्धार केला. जितेंद सावंत यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि सोसायटीचे सर्व संचालक यांनी परिश्रम घेतले.
लिंबमधून दोन्ही राजेंना मताधिक्य देण्याचा निर्धार
RELATED ARTICLES