मसूर : राज्यातील सर्व साखर कारखाने, साखरेच्या बाजारातील घसरलेल्या दरामुळे तसेच साखरेला मागणी नसल्याने आर्थिक बाबतीत मेटाकुटीला आले असताना सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने सन 2018-19 हंगामाच्या प्रतिटनास रूपये 2855/- निव्वळ एङ्गआरपी पोटी अन्य कारखान्यापेक्षा जादा अशी रूपये 2500/- उचल दिली होती व बाकी राहिलेली रक्कम देण्यासाठी, सर्व साखर कारखान्यांबरोबर कारखान्यास मिळालेल्या सॉफ्ट लोनची रक्कम व त्या रकमेत कारखान्याने स्वतःच्या आर्थिक नियोजनाने स्वतःजवळची काही रक्कम घालून बाकी रूपये 355/- रक्कम पूर्णपणे ऊस उत्पादक शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग केली, ही वर्ग केलेली रक्कम रूपये 46 कोटी 75 लाख 22 हजार 35 रूपये इतकी आहे. कारखान्याने सदर रकमा वर्ग केल्याचा एसएमएस शेतकर्यांना पाठविला आहे.
कारखान्याचे सन 2018-19 या गळीत हंगामात 13,16,963.94 मे.टन ऊसाचे गाळप होऊन 16,48,450 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. या गळीत हंगामात सरासरी साखर उतारा 12.38% इतका राहिला आहे.
कारखान्याने दिलेल्या ऊस बिलाचा उपयोग शेतीच्या पूर्व मशागतीसाठी, शेतकर्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी व लग्न सराईत उपयोगाचा होणार आहे.
कारखाना गरजेच्यावेळी उर्वरीत रक्कम देणार असा विश्वास कारखान्याने सार्थ ठरविल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, लोकं कारखान्याचे चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील व संचालक मंडळास धन्यवाद देत आहेत.
सह्याद्रिच्या एङ्गआरपीची पूर्ण बाकी रक्कम आदा; कारखान्याने तसा पाठविला एसएमएस
RELATED ARTICLES