म्हसवड ः भाजपा सरकार हे सामान्य जनतेला सन्मान देणारे सरकार आहे. छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. फूले, शाहू महाराज यांच्या विचारांचे सरकार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पून्हा संधी द्या, असे आवाहन सामाजिक न्याय मंत्री ना. राजकुमार बडोले यांनी केले.
म्हसवड येथील मागासवर्गिय निवासी शाळेचे उदघाटन ना. बडोले यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई,जिल्हा परिषद सदस्या सुवर्णाताई देसाई, माण तालुका भाजपा अध्यक्ष बाळासाहेब मासाळ, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वंभर बाबर,वैद्यकिय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. उज्वल काळे, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. सुवर्णा साखरे, जिल्हा उपाध्यक्ष विजय साखरे, गणेश माने, संदिप भोसले, शहराध्यक्ष अरविंद पिसे आदी मान्यवर उपस्थीत होते.
यावेळी ना. राजकुमार बडोले म्हणाले, काँग्रेसने सतर बर्षे सता भोगली मात्र जनतेला केवळ लूटण्याचे काम केले. गरीबी हटाव ही घोषणा केली. प्रत्यक्षात गरीबी हठली नाही. मुठभर लोक श्रीमंत झाले. अन् गरीब अधिक प्रमाणात गरीब झाला.भाजपा सरकार सतेत आले आणि चार वर्षात सामान्यातील सामान्य दलीत, शोषित समाजातील लोकांसाठी विविध योजना तयार करुन सामान्य जनतेला मदत केले.
शेतकर्यांना 6000 रु. देण्याची तयारी केली आहे, आता लवकरच 2000/ पहिला हप्ता मिळणार आहे. वीज, रस्ता, पाणी या मुख्य गरजा भागविण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. महिलासाठी, शेतकर्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. जी एस.टी. मूळे देशातील महागाई नियंत्रणात आली आहे. शेतकरी अधिक सक्षम बनवणे हे सरकारचे ध्येय आहे. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हेच ध्येय आहे. यापुर्वी च्या नेत्यांनी सहकार खात्यात भ्रष्टाचार केले. सहकारी संस्था उद् ध्वस्त केल्या. शेतकर्यांच्या नावावर लूट केली. ज्यांनी सतर वर्षात शेतकर्यांना एक रुपया दिला नाही. ते नेते भाजपावर आरोप करत आहेत. सहा हजारात काय होणार? तूम्ही ते पण दिले नव्हते. मराठा समाजाला आरक्षण दिले आता धनगर समाजालाही देण्याबाबत सरकार विचार करत आहे. देशाला नरेंद्र मोदीच्या रुपाने सक्षम पंतप्रधान मिळाले आहे. महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस हे धाडसी मुख्यमंत्री मिळाले आहेत. गेल्या साठ वर्षात न झालेले रस्त्यांची कामे सूरु आहेत. दुष्काळी भागातील पाणी प्रश्नासाठी निधी दीला असून उरमोडी प्रकल्पातून माण खटाव तालुक्याना पाणी देण्यासाठी 493 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. भाजपा सरकार हेच दलीत व वंचीत समाजाला न्याय देऊ शकते यासाठी परत भाजपाला सता द्यावी. असेही ते म्हणाले.
यावेळी अनिल देसाई म्हणाले, माण तालुक्यातील शेतकर्यांना 85 कोटी रुपयांची कर्ज माफी मिळाली आहे. माण, खटाव तालुक्यातील दुष्काळी भागांना पाणी देण्यासाठी सरकारने निधी दीला आहे. माणच्या दक्षिण भागातील सोळा गांवाना पाटाने पाणी दिले आहे. माण तालुकयात 400 कोटी रुपयांची रस्त्यांची कामे सूरु आहेत. डॉ. बाबासाहेबांचे विचारावर काम करणारे हे सरकार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत माण तालुक्यातून भाजपाचाच आमदार निवडून येईल. राज्यात भाजपाचे 150 आमदार येतील. तर 151 आमदार हा माण खटाव मधून नीवडून येणार आहे. माण मधील जनतेने यापूर्वी भाजपाला मतदान केले नाही, पण आता केवळ भाजपाचा आमदार देण्याचा निर्णय येथील जनतेने घेतला आहे. सरकारने सामान्य जनता, शेतकरी व महिला साठी चांगले निर्णय घेतले आहेत. विरोधी पक्षातील नेतेहि नरेंद्र मोदीच पून्हा पंतप्रधान व्हावेत ,अशी ईच्छा व्यक्त केली आहे . हेच भाजपाचे यश आहे.
यावेळी प्रा. विश्वभंर बाबर, सचीन गुदगे, बाळासाहेब मासाळ यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी विजय बनसोडे, गणेश माने, मार्तंड गुरव,दाजी पवार, धीरज दवे,अविनाश मासाळ,रत्नदिप शेटे,मन्सूर मुल्ला,राजाभाऊ देशमुख,सदांनंद ठेंगील, अरविंद पिसे,सुभाष वीरकर आदी कार्यकर्ते उपस्थीत होते. ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष विजय टाकणे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. जालींद्र खरात यांनी आभार मानले.
भाजपाचे सरकार हे दलित, वंचीताला न्याय देणारे ः ना. राजकुमार बडोले
RELATED ARTICLES