म्हसवड : म्हसवड पालिकेच्या घेण्यात आलेल्या विषेश सभेत सन 2019-20 या वित्तीय वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला यावेळी या अर्थसंकल्पावर विरोधक व सत्ताधारी पार्टीतील नगरसेवक व नगराध्यक्ष यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
म्हसवड पालिकेच्या सभागृहात विषेश सर्वसाधारण सभा व त्यानंतर वित्तीय वर्षाचा अर्थसंकल्पाची विषेश अशा दोन सभा घेण्यात आल्या या दोन्ही सभेत सत्ताधारी व विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याने पालिकेने केलेल्या विकासाच्या संकल्पाला कसलाहि अर्थ राहिला नसल्याचे दिसून आले. या दोन्ही सभा नगराध्यक्ष तुषार विरकर यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आल्या यावेळी मुख्याधिकारी पंडित पाटील उपस्थित होते.
बुधवारी म्हसवड चा आठवडा बाजार होता यावेळी पालिकेच्या सभागृहात मॅरेथॉन दोन सभा घेण्यात आल्या या दोन्ही सभेतील विषयावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली हि खडाजंगी पाहिली असता नक्की बाजार पालिकेच्या पटांगणावर भरला आहे का पालिकेच्या सभागृहात भरला आहे हेच समजत नव्हते यावेळी झालेल्या विषेश सर्वसाधारण सभा सुरू झाली या सभेत एकुण चार विषय होते हे चारीही विषय सोडुन विरोधी नगरसेवक अकिल काझी यांनी दि 22 आक्टोंबर 2018 च्या सभेत वाळू गट आरक्षित करणेचा विषय हा सभागृहात बहुमताने नामंजुर झाला असताना 5 नोव्हेंबर 2018 च्या सभेत तो मंजुर करणेत आला होता त्यावर काझी यांनी जोरदार अक्षेप घेतला आणि याच विषयावर किमान तास ते दिड तास गोंधळ सुरू होता. यानंतर सन 2019-20 या वित्तीय वर्षाचा अर्थसंकल्पाची विषेश सभा घेण्यात आली यावेळी सभेपुढे वित्तीय वर्षाचा अर्थसंकल्प ठेवण्यात आला यात दुष्काळी परिस्थिती असल्याने पालिकेने या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ केली नसल्याने म्हसवडकर जनतेला काहि अंशी दिलासा मिळाला असला तरी मागील वित्तीय वर्षातील खर्चाचा तपसिल मांडल्यावर सत्ताधारी पार्टीतील काही प्रमुख मंडळीनी जनतेच्या पैशाची लुट करून आपली घरे भरण्याचा उद्योग केला असल्याचा आरोप विरोधकांनी यावेळी केला यात मागील वर्षाच्या तपसिलात इतर बांधकामात झालेला खर्च 28 लाखाच्या मुद्द्यावरून काझी यांनी अक्षेप घेत हा खर्च नक्की कोठे केला यावर विचारले असता नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना समाधान कारक उत्तर देता आले नाही यावर काझी यांनी या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप सभागृहात केला तर पाणीपुरवठा मजुर ठेक्याचे बिल अदा केल्याचे दिसुन आल्याने विरोधकांना गोंधळ घालत आठ ते दहा दिवसातुन एकदा पाणी सोडले जाते तर मग एवढे मजुर नेमके कोणते काम करतात मग एवढे बिल कसे काढण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करून गेल्या वर्षभरात पाण्याच्या टँकरचे बिल 7 लाख 71 हजार व 4 लाख 41 हजार ऐवढे बिल काढले असुन पालिकेच्या इतिहासात आजपर्यंत येवढे बिल कधीच निघाले नसल्याचे विरोधी नगरसेवक डॉ. वसंत मासाळ म्हणाले तसेच आमचे नेते आमदार जयकुमार गोरे यांनी आमच्या मागील सत्तेच्या काळात आणलेले शहराच्या विकासासाठी वैशिष्ठ्य पुर्ण योजनेतील बहुउद्देशीय हॉलचा तब्बल तीन कोटीं एकोणसाठ लाख रूपयाचा निधी खर्च न झाल्याने परत गेला असल्याचा आरोप विरोधकांनी केला तर मागील सभेत गार्डनला राजमाता अहिल्यादेवी होळकर हे नाव देण्याचा ठराव झाला असून या गार्डन मध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्यात यावे अशी मागणी नगरसेवक डॉ वसंत मासाळ यांनी केली.
यावेळी सत्ताधारी पार्टीचे नगरसेविका श्रीमंत सौ हिंदमालादेवी राजेमाने, सौ सविता म्हेत्रे, कलावती पुकळे, नगरसेवक धनाजी माने, दिपक बनगर, गणेश रसाळ, शहाजी लोखंडे, संग्राम शेटे, केशव कारंडे, तर विरोधी पार्टीचे नगरसेविका मनिषा विरकर, शोभा लोखंडे, नगरसेवक अकिल काझी, वसंत मासाळ, विकास गोंजारी, रणजित येवगे आदी नगरसेवक हजर होते.
म्हसवड पालिका सभेत जोरदार खडाजंगी
RELATED ARTICLES