म्हसवड : पाणी फाउंडेशन ही आईच्या भूमिकेत असून त्या काळ्या आईचं ऋण फेडणे आपलं कर्तव्य असून यासाठी, गावकरी एक झाले की आपोआप आपला गाव एक होतोय आणि गाव एक झाला की श्रमदानातून पाणीदार होतोय.असे प्रतिपादन पाणी फाउंडेशनचे महाराष्ट्राचे समन्वयक डॉ अविनाश पोळ यांनी गोंदवले खुर्द येथील महा ग्रामसभेत केले.
पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून वॉटर कप 2019 च्या निमित्ताने येणार्या 45 दिवसांच्या मध्ये करण्यात येणार्या कामांच्या नियोजनासाठी गोंदवले खुर्द मध्ये मारुती मंदिरा समोर गावाची महा ग्रामसभा आयोजित केली होती. या सभेला गावातून सुमारे दीड हजार मुले मुली महिला पुरुष जमा झाले होते.या सभेला विशेष मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र समन्वयक डॉ अविनाश पोळ, चला हवा येऊ द्या मालिकेतील कलाकार भारत गणेशपुरे, मंत्रालयातील उपसचिव डॉ नामदेव भोसले, बाळासो शिंदे,अजित पवार,यांच्यासह गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, संचालक, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी डॉ. पोळ आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, या काळ्या आईने आपल्याला खूप भरभरून दिले असून तिची तहान भागवणे सुध्दा आपलं कर्तव्य आहे.आज थर्टी फस, व्हॅलेंटाईन डे अशी नवनवीन फॅड निघाली असून यांच्या माध्यमातून आपली भावी पिढी व्यसनी होऊ लागली आहे म्हणून मी 2004 साली माझ्या गावच्या परिसरात असणार्या सुमारे 67 गावातील युवकांना एकत्र करून अशा महत्वाच्या दिवशी गावातील मंदिरे रस्ते धुवून काढणे अशी शक्य असणारी कामे करायाला सुरुवात केली.त्यानंतर निश्चय करून अजिंक्यतारा किल्ल्यावर श्रमदान सुरू केलं यामुळे किल्ला स्वच्छ झाला किल्ल्यावर पाणी आडल आणि श्रमदान करणार्या लोकांच्या शरीराची चांगल्या प्रकारे निगा राखली गेली मी स्वतः 365 दिवस श्रमदान केलेला माणूस आहे आपण श्रमदानातून खूप काही मिळवू शकतो आपण मन आणि शरीर सुदृढ राहत आहे.पाणी फाउंडेशन काय पैसे घेऊन आले नाही.पाणी फाउंडेशन ज्ञान घेऊन आल आहे कारण पैसे चिरंतन टिकत नाही म्हणून ज्ञान महत्वाचे आहे.माणूस एकत्र आल्यावर सगळं शक्य असतं महाराष्ट्रात अनेक संत जन्माला आले त्यांचं कर्तृत्व खूप मोठं असून म्हणून आज ही आपण त्यांचं आपण स्मरण करतो .आज आळंदी ते पंढरपूर अशी वारी जाते यात कोणता गोंधळ धिंगाणा ना बंदोबस्त असतो कारण तिथे जाणारा प्रत्येक जण मनाने एक झालेला असतो.आपण ही एकत्र येऊन श्रमाची चळवळ सुरू करायची आहे.
कोणत्याही पैशा विना आपण आपलं गाव पाणीदार करू शकतो यासाठी आपण आपल्या शेतीत असणारी गांढुळे आता पासून मारायची नाहीत.आपल्या शेतातील पाचट,काड आपण रानातच मुजवायचं पेटवून द्यायचं नाही.गावातील सगळ्यांनी श्रमदान केलं तर खूप पाणी आडू शकत.फक्त आपण मनावर घेतलं पाहिजे.आज असणारी उपस्थिती पाहता आपण श्रमदानाला पण अशीच उपस्तीती लावली तर आपल्या गावाचा पाणलोटची वाढ होण्यास वेळ लागणार नाही. सगळ्यांनी एकत्र राहा याच शुभेच्छा आहेत.यानंतर नामदेव भोसले बाळासो शिंदे यांनी आपली मनोगते व्यक्त केली
दरम्यान चला हवा येऊ द्या फेम भारत गणेशपुरे यांनी लोकांना खूप मोलाच मार्गदर्शन करत लोकांना आजच्या दुष्काळी परिस्थितीची जाणीव करून देत असत एकत्र राहून मोठ्या प्रमाणात काम करून आपला पाणलोट वाढवा असा संदेश दिला.
पाणी फाउंडेशन ही आईच्या भूमिकेत : डॉ. अविनाश पोळ
RELATED ARTICLES