म्हसवड : म्हसवड येथील माणदेशी शास्त्रज्ञ डॉ.दिपक पिंजारी यांनी ग्लोबल वार्निंग बाबत केलेल्या संशोधनाची विशेष नोंद घेऊन जर्मनी येथील जागतिक पातळीवरील जागतिक युवा अकादमी (ॠश्रेलरश्र र्धेीपस Aलरवशू ) या संस्थेने डॉ.पिंजारी यांना या अकादमीचे अध्यक्षांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला व या अकादमीचे मानद सभासद पदही बहाल करुन त्यांना सन्मानित केले गेले.
डॉ.पिंजारी हे या अकादमीचे यंदाचे मानद सभासद पद मिळविणारे भारतातील चार शास्त्रज्ञांपैकी एक आहेत. यापुर्वीही डॉ.पिंजारी यांनी डाळींब फळातील रस फक्त तीनच दिवस टिकत असे हा डाळींब रस तब्बल सहा महिने जसाचा तसा टिकून राहणे बाबत केलेले संशोधन व गावोगावी विंधन विहिरीतील (बोअरवेल) पाणी हातपंपाने उपसून ते पाणी पिण्यास वापरले जाते हे पाणी र्निजंतुकीकरण करणे बाबत विजेशिवाय चालू शकणारे अल्प खर्चातील प्रक्रिये बाबत यशस्विरित्या केलेल्या संशोधनास वीस लाख रुपयांचे बक्षिस व पारितोषिक देऊन बेंगलोर येथील सुधामुर्ती एन्फोसिसज फाउंडेशनने त्यांना नुकतेच सन्मानित केले आहे.
डॉ.दिपक पिंजारी हे रासायनिक अभियांत्रिकी या विषयामध्ये संशोधन करतात.त्यांचे संपूर्ण शिक्षण (इ.ढशलह, च.ढशलह, व झक.ऊ.) महाराष्ट्र सरकारच्या मुंबई येथील इन्सिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (पुर्वीचे यु डी सी टी) येथे झाले. विद्यार्थी दशेतून त्यांना संशोधनाची खुप आवड होती. त्यांच्या डॉक्टरेट प्रबंधाला उत्कृष्ठ प्रबंध पुरस्कार मिळालेले आहेत.तसेच त्यांना भारत सरकारचे अत्यंत महत्वाचे मानले जाणारे तरुण शात्रज्ञ व तरुण इंजिनिअर पुरस्कार मिळाले आहेत. पुढे त्यांनी अमेरिका सरकारची फुलब्राईट फेलोशिप मिळविल्यानंतर
अमेरिकेत मोठ्या रक्कमेच्या पगाराच्या नोकरीची आलेली संधी धुडकावून त्यांनी आपल्या भारत देशासाठी संशोधनात योगदान देण्याचा निश्चय केला व ते सन 2015 मध्ये मायदेशी परतले.
त्यानंतर त्यांनी मुंबई येथे स्वत:ची इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हि प्रयोगशाळा उभारुन त्यामध्ये संशोधन करीत त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी मधील चार विद्यार्थ्यांच्या डॉक्टरेट आणि 12 विद्यार्थ्यांना त्यांच्या मास्टर ऑफ टेक्नोलॉजीच्या प्रबंधास यशस्वीरित्या मार्गदर्शन करुन या सर्व विद्यार्थ्यांना यश संपादन करुन देण्यात ते यशस्वी झाले.
याबरोबरच देशातील तीन नविन कार्पोरेट क्षेत्रातील नामांकित कंपन्या उभारण्यास यशस्वीरित्या योगदान दिले आहे. डॉ.पिंजारी यांनी आतापर्यंत 75 च्यावर संशोधनपर असे प्रबंध तयार केले. या प्रबंधाचा भारत सरकारने उच्च शिक्षणातील अभ्यास पुस्तकातील धड्यात समावेश केलेला आहे. तसेच स्वत:च्या नावावर संशोधनपर असे तब्बल सहा पेटंट नोंदविले आहेत.
डॉ.पिंजारी यांना देशात व परदेशातही व्याख्यानासाठी वेळोवेळी निमंत्रित केले जात आहे. सध्या ते भारत सरकार नियुक्त मुंबई येथील विद्यापिठात युजीसी मधील संशोधन पर विभागात सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत असुन
शहरी व ग्रामीण भागातही कचरा विल्हेवाट लावणे बाबतची सध्या उद्भवत असलेली समस्या, घनकच-यातून प्लास्टिक कचर्यापासून डिझेल इंधन निर्मिती.गटारीतून वाहून जात इस ले ले दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे पर्यावरणातील संतुलनात होत असलेला बिघाड व पाणी टंचाई समस्या यावर प्रभावशाली व अल्प खर्चातील सांडपाणी शुध्दीकरण व त्याचा पुर्नवापर यावर संशोधन करुन त्यांनी मुंबई येथे प्रायोगिक तत्वावर प्रयोग यशस्वी करण्यास यश मिळविले आहे.
तसेच डासांचा उपद्रव हि एक गंभीर समस्या असून नैसर्गिकरित्या डास पळवून लावणे बाबतचे संशोधन करुन त्यांनी शहरातील मोठी हॉस्पिटले व घरगुती वापरातील संशोधनपर नॅनो प्रयोग यशस्वी केलेले आहेत.
याबरोबरच रंग देणे हि प्रक्रिया खुपच वेळखाऊ असून वेळ व मजुरी खर्चातही मोठी बचत करण्याच्या दृष्टीने डॉ.पिंजारी यांनी संशोधन करुन किचकट, वेळखाऊ व मजुरी खर्चातील बचत पर केलेल्या या संशोधनामुळे रंगकामात मोठी क्रांती घडणार असल्याचा दावा डॉ.पिंजारी यांनी केला आहे.
माणदेशी शात्रज्ञ डॉ.दिपक पिंजारी यांनी अल्पवयात जागतिक स्तरावर अंत्यंत उपयोगी अशी नवनविन संशोधनपर क्षेत्रात केलेली कामगिरी तसेच त्यांच्या संशोधनाची देश व अनेक विदेशांनी नोंद घेऊन त्यांना पुरस्कारीत करुन जागतिक पातळीतील नामांकित शास्त्रज्ञांच्या यादीत समावेश करुन सन्मानित केलेबद्दत विविध स्तरातील मान्यवरांनी डॉ.दिपक पिंजारी यांचे अभिनंदन केले आहे.
डॉ.पिंजारी यांचा जागतिक तरुण अकादमीच्या पुरस्काराने सन्मान
RELATED ARTICLES