म्हसवड: येथील शंकरराव विरकर यांच्या नागोबा फाउंडेशन संचलित जनावरांच्या चारा छावणीस अहिंसा पतसंस्थेच्या वतीने गोळी पेंडीचे वाटप करण्यात आले. पशुधन जगले पाहिजे वाचले पाहिजे या उदात्त हेतूने अहिंसा पतसंस्थेने हा उपक्रम हाती घेतला असून या बद्दल छावणीतील शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले.
अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी यांचे हस्ते शेतकर्यांना गोळी पेंडीचे वाटप करण्यात आले.
प्रारंभी सामाजिक कार्यकर्ते व नागोबा विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री. बाळासाहेब मदने यांनी प्रास्ताविक केले.त्यानंतर माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरसेवक धनाजी माने,माजी नगरसेवक आप्पा विरकर, गाव कामगार तलाठी अकडमल,विपुलशेठ दोशी,अहिंसा पतसंस्थेचे व्यवस्थापक महेश पतंगे,इम्रान मुल्ला,सतीश विरकर,नाना मासाळ व बहुसंख्य महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.
अहिंसा पतसंस्थेच्या वतीने चारा छावणीस गोळी पेंड वाटप
RELATED ARTICLES