म्हसवड : पोलिस पाटील हा गाव आणि प्रशासन यांच्या मधील महत्वाचा दुवा आहे. पुर्वी गावगाड्यील तंटे हे पारावर मिटत होते. आता शासन गावातील तंटे गावातच मिटावेत व गावात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस पाटील यांना स्वतंत्र कक्ष देत असून पोलिस पाटील कक्षातून पोलिस पाटलांनी गावाचा कारभार निपक्षपाती पणे करून गावात कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करावे असे आवाहन माण खटावचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले
जांभुळणी ता माण येथील पोलिस पाटील सुभाषराव काळेल यांना देण्यात आलेल्या पोलिस पाटील कक्षाच्या उदघाटन प्रसंगी प्रांताधिकारी कांबळे बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी गोरख शेलार, सपोनि मालोजीराव देशमुख, अॅड. सिध्देश्वर काळेल,सरपंच भारत काळेल, माण खटाव पोलिस पाटील संघटणेचे कार्याध्यक्ष महेश शिंदे, माण तालुका पोलिस पाटील संघटणेचे अध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड,ग्रामसेवक टिळेकर, संजय खिलारी आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना कांबळे म्हणाले एक वर्षी पुर्वी माण खटाव तालुक्यात नाममात्र पोलिस पाटील होते.तत्कालीन विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी माण खटाव तालुक्यात पोलिस पाटील पदाची भर्ती करण्याचे आदेश दिले त्या मुळे आज माण तालुक्यात 159गावांमध्ये पोलिस पाटील पदे भरण्यात आली आहेत.पुर्वी पोलिस पाटील हे पद म्हणजे वतनदारी होती. आता पोलिस पाटील हा पोलिस प्रशासन व गाव यांच्या साठी मोठा दुवा ठरत आहे.
पुर्वीच्या काळात गावातील भांडणं पारावर बसून मिटवली जात होती. यामुळे पोलिसांचा भार हलका होत होता.मात्र मधल्या काळात पोलिस पाटील हे पद गावातून दुर्मिळ झाले होते. या मुळे पोलिस प्रशासनास अनेक गावीतील तंटे मिटविण्यासाठी शिकस्त करावी लागत होती.शासन गावातील तंटे गावातच मिटले पाहिजेत म्हणून महात्मा गांधी तंटामुक्त अभियान सुरू केले होते.
आता पोलिस पाटील हा महत्वाचा दुवा म्हणून काम करू लागल्याने शासनाने पोलिस पाटील कक्ष देण्याचे अद्यादेश काढले आहेत.या कक्षातून पोलिस पाटील वयाच्या 60वर्षी पर्यंत गावगाडा चालवणार असून, माण खटाव तालुक्यातील पोलिस पाटील हे कर्तव्यदक्ष असून त्यांनी निपक्षपाती काम करून गावातील तंटे गावात मिटवून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काम करावे असे आवाहन दादासाहेब कांबळे यांनी करून पोलिस पाटील यांचे दप्तर हे आत्मा असून त्यांनी आपले दप्तर अद्यावत ठेवावे असेही शेवटी सांगितले.
यावेळी गटविकास अधिकारी गोरख शेलार यांनी तालुक्यातील11ग्रामपंचायतीना इमारती नसल्याचे सांगून पोलिस पाटील यांना गावचा कारभार चांगल्या पध्दतीने करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक पोलिस पाटील यांना कक्ष देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले, तर सपोनि मालोजीराव देशमुख म्हणाले माण तालुक्यातील पोलिस पाटील हे आपले कर्तव्य अतिशय उत्तम पध्दतीने पार पाडत असून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कामही करत आहेत. आज पोलिस पाटील यांच्या मुळे गावातील किरकोळ भांडणं तंटे मिटवणे सुलभ होत असून पोलिस यंत्रणेवरील ताण हलका झाला आहे.
जांभुळणी गावचे पोलिस पाटील सुभाषराव काळेल यांचे काम आदर्श असून तालुक्यातील इतर पोलिस पाटील यांनीही आदर्शवत काम करावे असे आवाहन केले.
सदर कार्यक्रमास माण खटाव तालुक्यातील पोलिस पाटील, विविध गावचे आजी माजी सरपंच विकास सेवा सोसायटींचे चेअरमन, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक माण तालूका पोलिस पाटील संघटणेचे अध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड यांनी तर आभार पोलिस पाटील सुभाषराव काळेल यांनी मानले.
पोलिस पाटलांनी गावाचा कारभार निपक्षपातीपणे करून गावात कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करावे: प्रांताधिकारी कांबळे
RELATED ARTICLES