परळी: गेल्या पंधरादिवसांपासून पावसाचे तांडव संपुर्ण जिल्हयाने पाहिले. त्यात कित्तेकांचे बळी गेले, शेकडो जणांचे संसार उद्वस्त झाले परंतु पावसाने दोन दिवसांपासून शहरी भागाकडे उसंत घेतली असली तरी ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम आहे.
परळी खोऱयातील अतिवृष्टीमुळे कातवडी (ता. सातारा) येथील कांता देवरे यांचे घर जमीनदोस्त झाले आहे. यामध्ये सर्व गृहउपयोगी साहित्य अन्नधान्य व इतर वस्तुंवर घराची भिंत पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर नित्रळ (ता.सातारा) येथील संपत वांगडे यांच्या घराची पडझड झाली आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
कातवडी-नित्रळ येथे घरांची पडझड
RELATED ARTICLES