परळी : प्रवाशाच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य असणारे एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार नेहमीच चव्हाट्यावर येत असतो. ग्रामीण तसेच दुर्गम भागात ना दुरुस्त बससेवा यामुळे येथील नागरिकांना ऐन सणासुदीच्या काळात पायपीट करावी लागत आहे.
परळी खोर्यातील ग्रामस्थ सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारहाट करण्यासाठी सातारा परळी या ठिकाणी येत असतात. परंतु सकाळी येणारी एसटी अर्ध्या रस्त्यातच बंद पडत असल्याने ग्रामस्थांची गोची होत आहे. पाटेघर, अलवडी या ठिकाणी सकाळी येणार्या गाड्या नादुरुस्त असल्याने बंद पडत आहेत. अशीच अवस्था जांभे, चिखली भागाची आहे. तसेच खडगाव सकाळची 8 वाजताची एसटी परळी येथील कुंभारवाडा येथे चिखलात रुतल्याने अपघात होता होता टळला. तसेच यामुळे नित्रळ 10 ची एसटी तसेच सातारा ला निघालेली नित्रळ 8 ची एसटी अडकून पडल्या तब्बल 2 तासा नंतर जेसीबी च्या साहाय्याने एसटी बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यात आली. वेळेवर एसटी सेवा नसल्याने मुंबईहुन येणार्या चाकरनाम्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वेळेवर एसटी नाही आणि जी सेवा पुरवली जाते ती निकृष्ट दर्जाची तर मग प्रवाशांच्या सेवेसाठी कसे काय ब्रीद वाक्य वापरता असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत.
ऐन सणासुदीच्या दिवसात वाहतुकीचा खेळखंडोबा
RELATED ARTICLES