(अल्पेश लोटेकर)
परळी : सध्या दुष्काळाच्या झळा संपूर्ण महाराष्ट्राला भेडसावत आहेत. पाण्याची कमतरता असल्याने पशु पक्षी नागरीवस्तीच्या आसपास भटकत आहेत. परिसरातील पाणीसाठे आटत चाललेले आहेत, तसेच एप्रिल मे महिन्यात पक्षांच्या खाण्यासाठी काही मिळत नाही.
ही गंभीर बाब लक्षात येताच मित्रसेना संघटनेचे मित्रसेना प्रमुख शहाजी मुसळे (फौजी) यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्या प्राण्यांना मायेचा पाझर म्हणून टाकाऊ नारळाच्या वाट्या तसेच प्लास्टिक च्या बाटली यांच्या साहाय्याने मित्रसेनेच्या वतीने ठिकठिकाणी पाणी साठे तयार करण्यात आले आहेत. मित्रसेना पदाधिकारी शुभम सावंत, सागर मुसळे या दोन पदाधिकारी यांचा अध्यक्ष ते खाली वरील उपक्रम राबविण्यात आले
सातारा शहराचे तापमान गेल्या काही दिवसांपासून 42 अंशावर पोहोचल्याने उन्हाच्या झळा तसेच जिल्ह्यातील धरणाच्या पाणी पातळीतील झालेली कमालीची घाट यामुळे मुक्या प्राण्यांना अन्न पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याने अशाच काही वेळा पशु पक्षी तसेच हिंस्र प्राणी नागरी वस्त्यांमध्ये शिरकाव केल्यानेएखादा अनुचित प्रकार घडू नये या साठी मित्रसेना प्रमुख शहाजी मुसळे यांचा मागदशनाखाली तसेच मित्रसेना पदाधिकारी तसेच मित्रसैनिकांचा व मित्रसेना संघटणेचा सहकार्याने ग्रामीण खोर्यातील विविध गावो गावातून वाडी वस्त्यातून गावांमधून टाकाऊ नारळाच्या वाट्या तसेच प्लास्टिकच्या बाटल्या यांच्या साहाय्याने पशु पक्षांसाठी रानात पाणवठे तयार करण्यात आले आहेत. यांच्या उपक्रमाचे सर्वच स्तरावरून तसेच ग्रामीण खोर्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मित्रसेना संघटनेच्या माध्यमातून
केले जातेय समाजप्रबोधन
पाटण, सातारा, जावली, महाबळेश्वर, वाई, कोरेगाव,फलटण, माण, खटाव तसेच विविध ग्रामीण खोर्यातील युवकांना मित्रसेना संघटणेचा सारख्या माध्यमातून संघटित करत समाजकार्य तसेच समाजप्रबोधन या मित्रसेनेच्या वतीने केले जात असल्याने या संघटित ग्रुप कडून इतर संघटनांना एक नवी प्रेरणा मिळत आहे.
मित्रसेनेच्या वतीने पशु पक्षांसाठी पाणीसाठे; उपक्रमाचे होतेय कौतुक
RELATED ARTICLES