कोयना धरणातून २५००० हजार क्युसेक्स पाण्याचा होणार विसर्ग..
नदीकाठावरील गावांसह कराड, सांगली करांसाठी सतर्कतेचा इशारा..
पाटण:- कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढत आसताना १५ औगस्ट स्वातंत्रदिनाच्या दिवशी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे पावणे दोन फुटांनी उचलून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद १० हजार १४० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपत्रात सुरू करणेत आला आहे. धरण परिसरातील पावसाचा जोर वाढत आसताना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढत आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी रविवारी सकाळी १० वा. नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असून तो २५ हजार क्युसेक्स करण्यात येणार आहे.
कोयना धरणात सध्या ८७.६८ टि.एम.सी. पाणी साठा आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसचे प्रमाण वाढत आहे. केवळ ४ तासात महाबळेश्वर येथे ६१ मि. मी. तर नवजा येथे ९० मि.मी. पाऊस झाला आहे. पाण्याची आवक पहाता रविवार दि. १६ रोजी सकाळी १० वाजता एकूण विसर्ग २५००० क्युसेक्स करावा लागेल. नदीकाठच्या लोकांनी कृपया दक्षता घ्यावी.
गेल्या आठ दिवसापासून कोयना पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे कोयना धरणात पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. शनिवारी सकाळी धरणाची पाणीपातळी २१४७.११ फूट आणि ८६ टी.एम.सी. झाला असताना धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे.
कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांच्या उपस्थित शनिवारी सकाळी ११ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे १ फूट ९ इंचाने उचलून कोयना नदीपात्रात ९३६० क्यूसेक्स आणि पायथा विजगृहातून १०५० असे मिळून एकूण १० हजार १४० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मात्र धरण परिसरातील पावसाचा जोर वाढत आसताना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढत आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी रविवारी सकाळी १० वा. नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असून तो २५ हजार क्युसेक्स करण्यात येणार आहे.
या विसर्ग आणि पाणलोट क्षेत्रात कोसळणारा पाऊस यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होणार असून कोयना काठावरील कराड, सांगली येथील गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान कोयना परिसराला शनिवारी सकाळी १० वाजून २२ मिनिटांनी ३.१ रिश्टलस्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का बसला. मात्र या धक्याने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसून कोयना धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा प्रशासनाने दिला आहे.