पाटण:- काश्मीर पुलवामा येथे अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना पाटणमध्ये झेंडा चौकात श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सर्व पक्षीय पदाधिकारी, नागरिक, महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी पाकिस्तान हाय हाय, पाकिस्तान मुर्दाबाद अश्या घोषणा देत तीव्र शब्दात हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी तीव्र शब्दात भावना व्यक्त करताना सत्यजितसिंह पाटणकर यांनी आज सीमेवर आपले जवान उभे आहेत म्हणून हा आपला देश सुरक्षित उभा आहे. ते उभे आहेत म्हणून आम्ही-तुम्ही निश्चिंत आहोत. हा हल्ला त्यांच्यावर नसून सव्वाशे कोटी भारतीयांच्या काळजावरचा घाला आहे. या शहीद जवानांचे बलिदान न विसरणारे आहे. दहशतवांद्याचा केवळ निषेध व्यक्त करून चालणार नाही. तर त्यांना जशास तसे उत्तर देऊन दहशतवांद्याचे मुळापासून नयनाट केला पाहिजे. असे सांगून या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करून शहिद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सुरेश पाटील यांनी अतिरेक्यांच्या या हल्ल्या बाबत तीव्र शब्दात निषेध करून शहिद झालेला जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीमागे भारतीय नागरीकांनी उभे राहवे त्यांना या दुःखातून सावरण्यास सहकार्य करावे तरच खऱ्या अर्थाने त्यांना हि श्रध्दांजली ठरेल.
यावेळी संजय इंगवले, चंद्रहार निकम, शंकर मोहिते, अनिल बोधे, यांनी अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ मनोगत व्यक्त केले. पाटणमधील नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शोकसभेस विक्रमबाबा पाटणकर, बाळासाहेब जगताप, चंद्रकांत मोरे, शिवाजी कोळेकर, योगेश महाडिक, सौ. सय्यद भाभी, उमेश टोळे, शंकरराव कुंभार, सचिन कुंभार, गोरख नारकर, महादेव खैरमोडे, मंगेश पाटणकर, निलेश फुटाणे, अमोल खैरमोडे, कमलेश खैरमोडे, नितीन खैरमोडे, विद्या म्हासुर्णेकर, संजय कांबळे, सुभाष शिर्के, विक्रम यादव, पांडुरंग संकपाळ, कुमार सांळुखे, यांच्यासह पाटणमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.