पाटण:- रमणीय निसर्ग परिसरात डोंगर पायथ्याशी कुसवडे (दिवशी खु) येथे येथील सांळुखे परिवाराने श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जिर्णोद्धार केला. या मंदिरातील मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन येथील प्रसिद्ध धारेश्वर मठाचे मठाधिपती श्री. १०८ डॉ. निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांच्या हस्ते विविध कार्यक्रमात संपन्न झाला. यावेळी बोलताना धारेश्वर महाराज म्हणाले सांळुखे परिवाराकडून श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा झालेला जिर्णोद्धार धारेश्वर व दिवशी परिसरात पुण्यश्लोक आहे. यामुळे येथील परिसराला प्रती पंढरपूराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
या मंदिर जिर्णोद्धार मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन समारंभ वेळी पोलिस निरीक्षक उत्तम भापकर, प्रविण सांळुखे मुंबई पोलिस, अंकुशराव सांळुखे, शंकर मोहिते, गणेश मोरे, मंगेश पाटणकर, विक्रम जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोयना प्रकल्पामुळे कुसवडे येथुन विस्थापित झालेले सांळुखे कुटुंबाचे दिवशी खु. ता. पाटण येथेच डोंगर पायथ्याशी पुणर्वसन झाले. सुरवातीपासूनच सामाजिक कार्याशी नाळ असलेल्या या सांळुखे परिवाराने धार्मिक व अद्यात्मिक परंपरा जोपासत कुसवडे (दिवशी खु.) येथे निसर्ग परिसरात नव्याने श्री. विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर उभारले आहे. या मंदिरातील मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन येथील प्रसिद्ध धारेश्वर मठाचे मठाधिपती श्री. १०८ डॉ. निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी गिता श्लोक वाचन, मनाचे श्लोक वाचन, यज्ञ होमहवन, याबरोबर महामंडलेश्वर आबानंदगिरी महाराज वैराटगड यांचे प्रवचन, ह.भ.प. रामदास महाराज गोडसे यांचे किर्तन, रात्री भजन जागर कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास राहुल लोहार, प्रकाश पाटील, मोहन हादगेकर, किसन कदम, तुकाराम कदम यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ नागरिक उपस्थिती होते. कार्यक्रम यशस्वी पारपाडण्यासाठी समाजसेवा तरुण मंडळ, महाकाली सेवा मंडळ धारेश्वर दिवशी यांनी परिश्रम घेतले.