Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीसह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ‘त्या’ गावांनी मानले आ.देसाईंचे आभार

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ‘त्या’ गावांनी मानले आ.देसाईंचे आभार

सातारा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये असणारी 14 गांवे बफर झोनमध्ये घेणेची शासनाकडे बरेच वर्षापासून प्रलंबीत असणार्‍या कार्यवाहीची अंमलबजावणी युतीच्या शासनानेच केली असून या घेतलेल्या निर्णयाचे सर्व श्रेय हे राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व वनमंत्री ना.सुधिर मुनगंटीवारयांचे आहे पाटण मतदारसंघातील तमाम जनतेच्या व या 14 गावातील जनतेच्या वतीने मी त्यांचे जाहीर आभार मानतो असे प्रतिपादन आ. शंभूराज देसाईंनी केले.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये असणारी 14 गांवे बफर झोनमध्ये घेणेकरीता सातत्याने युतीच्या शासनाकडे पाठपुरावा करुन या प्रयत्नांना यश मिळवून देणारे तालुक्याचे आ.शंभूराज देसाई यांचे जाहीर विशेष आभार मानण्यचा कार्यक्रम कोयनानगर ता.पाटण येथे आयोजीत केला होता.याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये असणार्‍या 14 गांवातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार शंभूराज देसाई यांचा सत्कार करुन जाहीर आभार व्यक्त केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जयंवतराव शेलार, शिवदौलत सहकारी बँकेचे संचालक अशोकराव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य हरीष भोमकर, धोंडींराम भोमकर,प्रदीप पाटील, नथूराम सावंत,भागोजी शेळके, शैलेंद्र शेलार, बबनराव कदम, धोंडीराम बाकाडे,शशिकांत जाधव, शामराव सावंत,राजेश पवार, अंकुश देसाई,महेंद्र चाळके, रामचंद्र कदम,गोविंद चाळके,वसंतराव शेलार, आर.के. जाधव यांच्यासह प्रमुख गावचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आ.शंभूराज देसाई म्हणाले, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे खरे भूत हे तालुक्याच्या माजी आमदारांनीच या विभागातील जनतेच्या मानगुटीवर बसविले होते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारत असतानाच तालुक्याच्या माजी आमदारांनी जागरुकता दाखविली असती तर कदाचित ही वेळ या विभागातील जनतेवर आली नसती. या प्रकल्पाला माझा सुरुवातीपासून विरोध होता आणि श्रेय लाटण्याकरीता मी पत्रकबाजी करीत आहे असे अनेक आरोप माजी आमदारांनी माझेवर केले.माझा विरोध होता कारण विभागातील जनतेवर हे संकट येणार हे मला माहिती होते.प्रकल्प आला तेव्हा या तालुक्याचे आमदार कोण होते. राज्यात आणि केंद्रात सत्ता कुणाची होती.हे तालुक्यातील जनतेलाही चांगलेच माहिती आहे. आपली निष्क्रीयता झाकण्या करीता बिनबुडाचे आरोप करण्यारे माजी आमदार यांनी कितीही आटापिटा केला तरी हा निर्णय कुणाच्या काळात आणि कुणाच्या मागणीवरुन झाला आहे हे जनतेच्या चांगले लक्षात आले. गेली साडेचार वर्षे हा निर्णय करुन घेणेकरीता माझे शासनाकडे प्रयत्न सुरु होते हे या विभागातील जनतेलाही माहिती आहे.या विषयासंदर्भात होणार्‍या सर्व बैठकांना मी उपस्थित होतो.राज्याचे वनमंत्री यांचेकडे माझे सातत्याने प्रयत्न सुरु होते.
सत्तेत युतीचे शासन असले तरी हा निर्णय करुन घेणेकरीता मला साडेचार वर्षे लागली हा निर्णय सहजा सहजी झालेला नाही वेळप्रसंगी सत्ताधारी पक्षाचा आमदार असताना सुध्दा शासनाकडे मला संघर्ष करावा लागला आणि तो मी केला म्हणूनच हे यश आपल्याला मिळाले या निर्णयाचे सर्व श्रेय हे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व वनमंत्री ना.सुधिर मुनगंटीवार यांचे आहे मी त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो प्रत्यक्ष भेटूनही मी या दोघांचे जाहीर विशेष आभार मानणार असल्याचेही आ.शंभूराज देसाई शेवठी बोलताना म्हणाले. यावेळी जिल्हाप्रमुख जयंवतराव शेलार, अशोकराव पाटील,माजी हरीष भोमकर यांची भाषणे झाली यावेळी शैलेंद्र पवार, बाबुराव बाकाडे, लक्ष्मण सुतार तसेच 14 गावातील या प्रमुख कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular