पाटण:- पाटण शहराची लोक संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी सत्यजितसिहं पाटणकराच्या मार्गदर्शना खाली पाटण नगरपंचायतीच्या वतिने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन केले जात आहे. यामुळे नागरीकांना पुरेसे पाणि मिळत आहे. मात्र आगामी काळातील निवडणुका डोळ्या समोर ठेवुन विरोधक उगाच नागरीकांची दीशाभुल करण्याचा प्रयन्त करीत आहेत. पाटण शहरात विरोधकांची चाललेल्या ढवळा-ढवळीला शहरातील सुज्ञ नागरीक याला बळी पडनार नाही. असे पाटण नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सुषमा महाजन व उपाध्यक्ष दीपक शिन्दे यानी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते पुढे म्हणाले की माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकरांनी २००१ साली. पाटण शहरातील नागरीकाना २०२५ साला पर्यंत पाणी पुरेल अशी साडे चार कोटी रूपयांची योजना मंजुर केली त्याचे कामही चागंल्या पध्दतीने झाले लोकानां पाणी मुबलक मिळु लागले आहे.
पाटण तालुक्याच्या नागरीक आपल्या मुलाच्या शिक्षणा साठी व विविध उध्दोगाच्या निम्मीताने व्यापारी तर पाटण मधील विविध विभागातील काही अधीकारी पाटण मध्ये चागंल्या सुविधा मिळत असल्याने येथे रहीवाशी झाले आहेत. पाटण शहराची लोक संख्या झपाट्याने वाढुन २५ हजारच्या वरती गेली आहे त्यातच दररोज तालुक्यातुन व तालुक्याच्या बाहेरुन आपल्या शासकीय कामासाठी व बाजारहाट करण्यासाठी येथे नागरीक येत असतात त्या मुळे पाण्याची मागणी वाढली आहे. पाटण शहराची रचना चढ उतार असल्या काही ठीकाणि कमी जास्त दाबाने पाणी जाते पण ते पुरेसे असते.
पाटण शहरात पाणी पुरेसे मिळत नसते तर शहरातील नागरीकांनी आपली कपडे धूण्या साठी नदी काठी रांग लावली असती हे विरोधकांनी ध्यानात घ्यावे. काही नागरीक नळाला पाणी आल्यावर आपल्या मोटर सायकल व चारचाकी गाड्या ही धुत असतात मग पुरेसे पाणि मिळत नसते तर या ठीकानी नागरीकानी आपली वाहणे धुतली असतीका असा सवाल त्यानी केला. जे विरोधक टीका करतात त्यानीच पाटण शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रस्तावास अधीकाऱ्यांच्यावर दबाव आणून ना मंजुर कसा होईल हे पाहीले. मात्र आमचे नेते विक्रमसिंह पाटणकर व सत्यजितसिह पाटणकरांच्या प्रयत्नाने पाणी पुरवठ्या साठी निधी मंजुर झाला आहे. त्याचे काम प्रगतिपथावर आहे. लवकरच नविन मोटर बसुन नागरीकाना मुबलक पाणि मिळेल.
आज पाटण शहरात नागरीकांचे सहकाऱ्याने व नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक रात्र दीवस राबुन आप आपल्या प्रभागात काँक्रीटचे रस्ते, गटारे, मुताऱ्या, अशी विविध विकास कारुण घेत आहेत. अनेक कामे चालु आहेत. पाटण शहर स्वच्छ कसे राहील हे पाहात आहेत. त्यामुळे स्वच्छता अभियान मोहीम चागंल्या पध्दतीने राबिविण्यात येत असल्याणे पाटण शहर स्वच्छ व सूदंर दीसत आहे हे विरोधकांचे डोळ्यात खुपत असल्यानेच ते पाटण शहरा बाबत टीका करीत आहेत आमचे नेते विक्रमसिहं पाटणकर व सत्यजितसिंह पाटणकर हे पाटणचा विकास करणाऱ्यां साठी खंबिर व कठीबध आहेत. विरोधकांनी पाटण शहराची काळजी न करता तालुक्याच्या विविध भागात टँकरने पाणि पुरवठा केला जात आहे. तिथे लक्ष देऊन येथील नागरीकांना कीमान पिण्याचे तरी पाणी द्यावे असा टोला शेवटी त्यानी मारला