पाटण:- पाटण तालुक्यात १९८३ पुर्वी येथील डोंगर पठारावरील लोकांना या गावा वरुण त्या गावाला व पाटण शहरात आपल्या विविध कामाला यायचे झाले तर आठ -आठ तास पायपीट करुन जावे लागत होते. येथील जनतेला नाहक यातना भोगाव्या लागत होत्या. यातुन मुक्त करण्यासाठी माजी मंत्री विक्रमसिहं पाटणकरांनी आमदार झाल्यावर पाटण तालुक्यातील विविध विभागातील घाट फोडुन डोंगर माथ्यावर रस्त्याचे जाळे विणले. त्या मुळे दळण वळण करणे सोपे झाले मात्र ही कामे आपणच केली असल्याचे विरोधक डांगोरा पिठूण सांगतात. यांनी कोणते घाट फोडुन रस्ते केले ते दाखवावे असे आव्हान युवा नेते सत्यजितसिहं पाटणकर यांनी विरोधकांना केले. वाटोळे ता. पाटण येथे रस्त्ताचे भुमिपुजन सत्यजितसिंह पाटणकर यांचे हस्ते झाले त्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जि.प सदस्य बापुराव जाधव, महादेव पवार, मारुती पवार, पाडुंरंग पवार, हरीभाऊ पवार, धोंडीराम ताटे, लक्ष्मण झोरे (सर), सुरेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सत्यजीतसिंह पाटणकर म्हणाले की पाटण तालुक्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब अजितदादा पवार यांचे माध्यमातून विक्रमसिह पाटणकरांनी रस्त्याचे जाळे विनलेच पण डोगंर माथ्यावर अंधारात चाचपडत बसलेल्या गावात गाव तिथे विज पोहचवली, गाव तिथे एस टी पोहचवली, त्या मुळे लोक काही तासातच पाटण तालुक्याच्या विविध भागात ये जा करु लागले, म्हणूनच डोगंर पठारावरील रागंडा माणुस आज राष्ट्रवादीच्या व विक्रमसिंह पाटणकरांचे पाठीशी उभा आहे. विरोधकांनी राजकारणासाठी गावा- गावात व भावकी – भावकी मध्ये भांडणे लावून गुण्या गोविंदाने राहणाऱ्या लोकांत मतभेद पसरवले. याच उदाहरण म्हणजे वाटोळे गाव या गावातील जनता या पुर्वी एकत्र राहत होती. विविध कार्यक्रमात सर्व समाज एकत्र येवुन एकत्रीत गूण्या गोविंदाने नादंत होता. जात, पात ,भेद, भाव कुठे दिसत नव्हता. पण याच गावात एकमेकांत भाडंण लावली आणि मत भेद पसरवून आपल्या राजकारणाची पोळी भाजण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. मात्र येथून पुढे पुणे मुबंईतील राहणारी मंडळी सर्व मतभेद विसरुन एकत्र आली ही चांगली बाब आहे. या पुढे ही आपण वाटोळे गावासह डोगंर पठारावरील विकास कामांना जास्तीत जास्त निधी देवून राष्ट्रवादीच्या माध्यमातुन विकास कामे करु. आपण ही आपल्या गावातील एकमेकात असनारे मतभेद बाजुला ठेवुन सर्व मंडळी एकत्र यावे या पठारावरील ही आपल्या पासुन दुर गेलेल्या मडंळीना आपल्या सोबत आणा. व राष्ट्रवादीच्या पाठीशी खंबिरपणे उभे रहा असे आवाहन शेवटी त्यांनी केले.
यावेळी जि.प.सदस्य बापुराव जाधव म्हणाले की माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व सत्यजितसिंह पाटणकर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातुन व केंद्रीय मंत्री शरद पवार साहेबांच्या फंडातुन पाटण तालुक्यात कोठ्यावधीची कामे केली आहेत. तर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मार्फत घरघंटी, शिलाई मशिन, कडबा कुडी या सारखी व्यक्तीगत ही योजनांचा लाभ जनतेला दिला आहे. हे देताना तो कार्यकर्ता कोणत्या गटाचा आहे हे पाहिले नाही. विकासात कधी दादांनी राजकारण केले नाही या पुढे आपला व आपल्या गावाचा विकास साधण्यासाठी सत्यजितसिंह पाटणकराच्यां पाठीशी खंबीरपणे उभे राहुन त्यांना भरघोस मतांनी विजयी करुया. असे अवाहन त्यांनी शेवटी केले.
यावेळी वाटोळे गावातील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला त्यांचे स्वागत सत्यजितसिंह पाटणकर यांनी केले. उपस्थितांचे स्वागत शंकर पवार यानी केले तर वसंत पवार यांनी आभार मानले. प्रकाश आगाशे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाला वाटोळे गावासह परिसरातील कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.