पाटण:- राज्यात व देशात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला सक्षमीकरण राबवून महिलांसाठी विविध नवीन योजना चालू केल्या. या योजनांचा महिलांना चांगल्या प्रकारे लाभ झाला. भाजपच्या काळात या देशातील व राज्यातील लाखो महिला सक्षम झाल्या. या योजनांचा पाटण शहर व परिसरातील अनेक महिलांना लाभ झाला. याबद्दल पाटण शहर व परिसरातील महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करुन रक्षाबंधना निमित्त राख्या पाठविण्याचा कार्यक्रम घेतला. यावेळी शकडो महिलांनी भाजपा नव सदस्यांची नोंदणी करून भाजपाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केला आहे. असे सातारा जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा आयेशा सय्यद यांनी बोलताना सांगितले.
पाटण येथे भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने स्व. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त भाजप नवसदस्यता अभियान व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कृतज्ञता म्हणून रक्षाबंधना निमित्त राख्या पाठविण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या.
पाटण येथे भारतीय जनता पार्टीने स्व. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त भाजप नवसदस्यता अभियान सुरू करुन नवीन महिला सदस्यांची नोंदणी केली. सातारा जिल्हा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा आयेशा सय्यद यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मागील पाच वर्षात देशातील व राज्यातील सर्व महिला वर्गाला सर्व शासकीय योजनांची अंमलबजावणी करून सक्षम करण्याचा प्रयत्न केला. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करुन रक्षाबंधनाच्या पर्वानिमीत्त पाटण मधील सर्व लाभार्थी महिला व पक्ष सदस्यांकडून पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना राख्या पाठविण्यात आल्या. यावेळी सातारा जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सौ आयेशा सय्यद यांचा सर्व लाभार्थी महिला यांचे वतीने सत्कार करण्यात आला. सर्व लाभार्थी महिलांनी यापुढील काळात भाजपाला मतदान व साथ करण्याचे वचन दिले.
या कार्यक्रमामध्ये पाटण व पाटण परिसरातील जवळपास ५० महीला नवसदस्य व २० पुरूष नवसदस्य यांची नोंदणी झाली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा तालुका अध्यक्ष फत्तेसिंह पाटणकर, सौ नूरजहांँ खाटिक जिल्हा चिटणीस महिला आघाडी, तालुका चिटणीस अनिल बोधे, यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी संजय गांधी निराधार योजना, उज्ज्वला गॅस योजना, मातृवंदन योजना, प्रधानमंत्री आवास योजना तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजना लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.