पाटण:- पाटण तालुक्यासह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या सततधार पाऊसाने कोयना धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाचा पाणी साठा ६८ टि.एम.सी. इतका झाला आहे. तर पाटण तालुक्यातील दुसरे तारळी धरण पुर्ण क्षमतेने भरले असून या धरणाच्या सांडव्या वरुन नदी पात्रात प्रतिसेकंद दोन हजार क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. तारळी धरणाची पाणी साठवण क्षमता पाच टि.एम.सी. असून पाऊसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून जादा पाणी सोडण्यात येणार आहे. तारळी, क्रुष्णा नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तर सततधार पाऊसाने त्रिपुडी ता. पाटण येथील मारुती आनंदा जाधव यांच्या घराची भिंत रविवारी रात्री ३ वा. सुमारास कोसळली सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही. मात्र या घराचा पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे.
पातळीत झपाट्या वाढ होत आहे. गेल्या २४ तासात पाऊसाने धरणातील पाणी पातळी २१२७ . ०७ फूट झाली असून टि.एम.सी. मध्ये हा पाणी साठा ६८ इतका झाला आहे. तर पाटण तालुक्यातील दुसरे तारळी धरण पुर्ण क्षमतेने भरले असून या धरणाच्या सांडव्या वरुन नदी पात्रात प्रतिसेकंद दोन हजार क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. तारळी धरणाची पाणी साठवण क्षमता पाच टि.एम.सी. असून पाऊसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून जादा पाणी सोडण्यात येणार आहे. तारळी, क्रुष्णा नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.कोयनेसह पाटण तालुक्यात मोरणा- गुरेघर, निवकणे, चिटेघर, तारळी, वांग-मराठवाडी या लघुपाटबंधारे धरण परिसरात दमदार पाऊस पडत आहे. यामुळे हि सर्व कोयना वगळता पाटण तालुक्यातील इतर सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. तर कोयना, केरा, मोरणा, काजळी, उत्तरमांड, तारळी, वांग या नद्याच्या पाणि पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने या नद्या तुडुबं भरुन वाहत आहेत.
दरम्यान पाटण तालुक्याच्या सर्वदूर विभागातही पावसाने कहर केला असून जोरदार पावसाच्या सरीवर सरी कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर सततधार पाऊसाने त्रिपुडी ता. पाटण येथील मारुती आनंदा जाधव यांच्या घराची भिंत रविवारी रात्री ३ वा. सुमारास कोसळली सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही. मात्र या घराचा पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे. गेल्या चार दिवसा पासून मुसळधार पावसामुळे नद्या, ओढ्याना पूर आल्याने पाटण नवीन बसस्थानकात आणि आजूबाजूच्या दुकान गाळ्यात पाणी शिरले होते. यात प्रवाश्यांचे मोठे हाल झाले. दुपारी पाणी ओसरल्यावर वाहतूक सुरळीत झाली. संततधार पावसामुळे दुर्गम डोंगराळ भागातील जनता मात्र चांगलीच गारठली आहे.
गेल्या २४ तासात कोयना येथे – ८० मि.मी. ( एकुन- २८५७ ) मि.मी., नवजा येथे- ५४ मि.मी. (एकुन- ३३२५ ) मि.मी. तर महाबळेश्वर येथे- ८५ मि.मी. (एकुन- २८९५ ) मि.मी. पाऊस पडल्याची नोदं झाली आहे.