पाटण:- पाटणचे संसद पट्टू मी ग्रिस, लंडन, अमेरिका जग फिरल्याच्या वल्गना करत आहेत. पण त्यांना कुठे माहिती आहे. जग फिरल्याशिवाय बाहेरच्या नवीन तंत्रज्ञानाबरोबर रोजगार उपलब्ध करता येतो ते. मी द्रुष्टपुष्ट आहे. आजारी पडायला मला कुठला नाद नाही. म्हणून तालुक्यात नवीन रोजगार उपलब्ध करण्यासाठी मी जग फिरतो. संसद पट्टूचें जग फिरणे म्हणजे पुणे, मुंबई, कोल्हापूर च्या पुढे त्यांची इच्छा होत नाही. हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे. केवळ खोट्या वल्गना करून खोटे बोल पण रेटून बोल.. हा मागचाच आजेंडा संसद पट्टूनी निवडणूकीच्या तोंडावर सुरू केला आहे. अशी खरमरीत टिका सत्यजितसिंह पाटणकर यांनी आ. शंभुराज देसाई यांच्यावर शिवस्वराज्य यात्रा सभेत केली.
यावेळी खा. डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, अमोल मेटकरी, तेजस शिंदे, प.स. राजेश पवार, उज्वला जाधव, प.स. उपसभापती राजाभाऊ शेलार, राजाभाऊ काळे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्यजितसिंह पाटणकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले पाटणच्या संसद पट्टूनी खोटे बोल पण रेटून बोल या नेहमीच्या सवयी प्रमाणे पाटण तालुक्यात अठराशे कोठी रुपयेचा डांगोरा पिठला आहे. अठराशे कोठी रुपये विकास कामाचे पत्रक घरोघरी देण्याचा देखावा सुरू केला आहे. अठराशे कोठी म्हणजे अठराशेवर किती शुन्य हे तरी पट्टूनां माहिती आहे का ? तालुक्याच्या कानाकोपऱ्यात कुठेही जावा अठराशे कोठीचा विकास कुठे दिसतो ? असे सांगताना सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले पाटणचे संसद पट्टू मी ग्रिस, लंडन, अमेरिका जग फिरल्याच्या वल्गना करत आहेत. पण त्यांना कुठे माहिती आहे. जग फिरल्याशिवाय बाहेरच्या नवीन तंत्रज्ञानाबरोबर रोजगार उपलब्ध करता येतो ते. मी द्रुष्टपुष्ट आहे. आजारी पडायला मला कुठला नाद नाही. म्हणून तालुक्यात नवीन रोजगार उपलब्ध करण्यासाठी मी जग फिरतो. संसद पट्टूचें जग फिरणे म्हणजे पुणे, मुंबई, कोल्हापूर च्या पुढे त्यांची इच्छा होत नाही. हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे. अठराशे कोठीचा पोलखोल करा. उघड्याला उघडे करा. असे आहवानच त्यांनी या सभेत कार्यकर्त्यांना केले.
या संसद पट्टू महाशयांनी पाटण तालुक्यातील रोजगार हद्दपार केला आहे. तालुक्यातील तरुणांना स्वतः कुठला रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न करायचा नाही. आणि दुसऱ्याला करुनही द्यायचा नाही. पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणाऱ्या कोयना पर्यटनाला खिळ घालण्याचे पाप या संसद पट्टूनी केले आहे. वीटभट्टी वर रोजंदारीवर जगणाऱ्या कुटूंबाच्या चुली बंद करण्याचे पाप याच संसद पट्टूनी केले आहे. रोजगारासाठी बाहेर जाणाऱ्या तरुणाईला हेच संसद पट्टू जबाबदार आहेत. गेल्या पाच वर्षात पाटण तालुक्यात टक्केवारी ला ऊत आला आहे. बगलबच्यांनाच कौंट्रेक्टची कामे द्यायची आणि टक्केवारी कमवायची. टक्केवारी ची सत्ता पाटण मधून हद्दपार करायची आहे. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राची सुरुवात पाटण मधूनच करा. असे त्यांनी यावेळी शेवटी सांगितले.
यावेळी अमोल मेटकरी म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार शिवसेनेने गमावला आहे. शिवसेनेच्या सामना मधून मराठा क्रांती मोर्चाला मुका मोर्चा म्हणून समस्त मराठा समाजाचा अपमान केला आहे. त्याही पुढे जाऊन मराठा युवकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर वडापाव साठी करून अवमान केला आहे. अशा शिवसेनेचे शिवबंधन बांधून महाराष्ट्राला गुलाम करण्याचे कारस्थान शिवसेना करत आहे. तर त्यांच्याबरोबर रावसाहेब दानवे शिवस्वराज्य यात्रेला ‘प्रेत यात्रा’ म्हणून शिवाजी महाराजांचा अपमान करत आहेत. अशा या शिवविरोधी वल्गना करणाऱ्या शिवसेना – भाजपलाच हद्दपार करण्याची वेळ आली आहे. असे सांगताना अमोल मेटकरी पुढे म्हणाले नावात शंभुराज असुन भागत नाही तर तशी कर्तबगारी लागते आपल्या शंभुराज चा पाढा सत्यजितसिंहानी वाचला आहे. त्यावर मला बोलण्याची आता गरज वाटत नाही. पण एक सांगतो येणाऱ्या निवडणूका बैलेट पेपर वरती घ्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मी निवडणूक लढवितो त्यांचे डिपौजीट जप्त केल्याशिवाय राहणार नाही. असे आहवान त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केले.
या शिवस्वराज्य यात्रेत पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांसह युवा वर्ग महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.