Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीऐट्रासिटी कायद्यासारख्या गुन्ह्यांचा गैरवापर रोखण्यासाठी बुद्ध पोर्णिमेला पाटण येथे नव्या क्रांतीला सुरुवात.

ऐट्रासिटी कायद्यासारख्या गुन्ह्यांचा गैरवापर रोखण्यासाठी बुद्ध पोर्णिमेला पाटण येथे नव्या क्रांतीला सुरुवात.

पाटण :- ऐट्रासिटी कायद्याचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी गौतम बुद्ध पोर्णिमा जयंती दिवशी पाटण येथे नव्या क्रांती ला सुरवात झाली असुन मराठा क्रांती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा च्या समन्वयकांनी एकत्र येवून सामाजिक ऐक्य समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पाटण तालुक्यात कुठे जातीय तेढ निर्माण झाला अथवा ऐट्रासिटी सारख्या गुन्ह्याचा प्रश्न निर्माण झाला तर या सामाजिक ऐक्य समिती समोर हा वाद आणून या वादाची शहानिशा करूनच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या सामाजिक ऐक्य समिती कडून पाटण तालुक्यातील सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. अशा समित्या पाटण तालुक्यातील प्रत्येक विभागात स्थापन करण्यात येणार असून या समितीत काम करण्याची इच्छा असणाऱ्या सामाजसेवकांनी “पाटण तालुका सामाजिक ऐक्य समिती” च्या २ जुन २०१९ रोजी रविवारी पाटण येथे होणाऱ्या बैठकीस हजर राहण्याचे आवाहन आज झालेल्या बैठकीत करण्यात आले आहे.

पाटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे मराठा क्रांती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा च्या समन्वयकांनी गौतम बुद्ध पोर्णिमा जयंती साजरी केली. असता यावेळी पाटण तालुका सामाजिक ऐक्य समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. पाटण तालुका डोंगर-दुर्गम असुन तालुक्याच्या प्रत्येक गावात सर्व समाज गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहे. काही ठिकाणी अपवाद वगळता किरकोळ कारणावरून सामाजिक तेढ व वाद निर्माण होतात. असे काही वाद ऐट्रासिटी सारखा गुन्हा दाखल होण्यास हि भाग पडतात. अनेक वेळा अशा वादापाठीमागे राजकीय अथवा गावगुंड समाज कंठक आपल्या स्वार्थाची पोळी बाजून घेताना दिसतात. आणि दोन्ही समाजात जातीय वाद घडवून आणतात. हा प्रकार सामाजिक ऐक्य बिघडविण्याच्या द्रुष्टीने केला जातो. अशा समाज कंठकांना बाजूला सारून सर्व समाज्यात ऐकोपा राहण्याच्या द्रुष्टीने “पाटण तालुका सामाजिक ऐक्य समिती” स्थापन करण्याचा निर्णय गौतम बुद्ध पोर्णिमा जयंती दिवशी झाला आहे.

काही कारणास्तव कुठे जातीय वाद निर्माण झाल्यास हा वाद प्रथम सामाजिक ऐक्य समिती समोर आणला जाणार आहे. कोणावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन समिती मार्फत या वादाची शहानिशा करून ऐकोपाने वाद मिटविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र विनाकारण कोणी वाद घडवून आणून समोरच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केल्यास असा अन्याय हि समिती खपवून घेणार नाही. अशा वेळी हि समिती ज्याच्यावर अन्याय झालाय त्याच्या बाजूने उभी राहून त्याला कायदेशीर बाबीने मदत करेल. मग तो कोणत्याही समाजाचा असो. असा हि निर्णय यावेळी घेण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पाटण येथे गौतम बुद्ध पोर्णिमा जयंती निमित्त झालेल्या या बैठकीत यशवंतराव जगताप, प्रा. रविंद्र सोनावले, बापुसाहेब जाधव, सुरेश पाटील, प्रानलाल माने, संजय इंगवले, राजेंद्र पाटणकर, विजय थोरवडे, नितीन पिसाळ, धनंजय केंडे, दिपक भोळे, शंकर मोहिते, दिनकर माथने, संजय कांबळे, नितीन सत्रे, मंगेश पाटणकर, शिवाजीराव कोळेकर, दिपक मांडवकर, युवराज सांळुखे, शशिकांत देवकांत, रविंद्र देवकांत, नामदेव चव्हाण, दयानंद जगताप, उत्तमराव कदम, सर्जेराव सांळुखे, निव्रुत्ती मगरे गुरुजी, सुभाष शिर्के, दिपक गायकवाड आदी मराठा क्रांती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा पाटणचे समन्वयक हजर होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular