फलटण : माढा लोकसभा मतदारसंघातून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवावी अशी एकमुखी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणचा स्वाभिमान जपण्यासाठी येत्या दोन दिवसात योग्य तो निर्णय घेऊ अशी ग्वाही त्यांनी दिली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढ़विन्याबाबत रणजित नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची तातडीची बैठक येथील शुभारंभ लॉन्स मध्ये बोलविली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगर पालिकेतील विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर होते यावेळी प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी जयकुमार शिंदे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवाजीराव फडतरे तालुकाध्यक्ष तुकाराम शिंदे शहराध्यक्ष अशोकराव जाधव नगरपालिकेतील काँग्रेसचे सर्व नगरसेवक, ऋषीराज नाईक-निंबाळकर, शिराजभाई शेख, महेंद्र बेडके अशोकराव भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी सुरुवातीला कार्यकर्त्यांनीं मनोगत व्यक्त करताना आगामी लोकसभा निवडणूक माढा लोकसभा मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लढवावी राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारसंघ सोडला तर ठीक अन्यथा अपक्ष किंवा भाजपमधून निवडणूक लढण्याविन्याची जोरदार मागणी कार्यकर्त्यांनी केली अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसला सत्तेमध्ये बरीच वर्षे संधी मिळालेली नाही आज माढा लोकसभा मतदारसंघात सर्व परिस्थिती जुळून येत असताना व या मतदारसंघातील रणजित नाईक निंबाळकर यांचे वाढलेले महत्त्व पाहता त्यांनी आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेऊ नये असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
यावेळी बोलताना रणजित नाईक निंबाळकर म्हणाले की कार्यकर्त्यांच्या भावना आपण समजून घेतल्या आहेत माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रीय काँग्रेसला सोडावा यासाठी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलणी करत आहेत मतदार संघ राष्ट्रीय काँग्रेसला सोडल्यास निश्चितच आपण उमेदवार असणार आहोत येत्या दोन दिवसात काय होतं हे पाहूनच योग्य ती भूमिका आपण घेऊ या फलटणचा स्वाभिमान जपला पाहिजे या मताशी आपण ठाम असून कार्यकर्त्यांच्या शब्दाबाहेर आपण जाणार नाही दोन दिवसातच सर्व चित्र स्पष्ट होईल व कार्यकर्त्यांना विचारून पुढील दिशा ठरवू असे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
माढा लोकसभा मतदार संघातील विविध पक्षातील त्यामध्ये आ जयकुमार गोरे, आ रामहरि रूपनवर, आ भारत भालके हे आपल्या उमेदवारिसाठी जोरदार प्रयत्न करत असून सोलापुर जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे, उत्तमराव जानकर, पंढरपुरचे परिचारक हे मित्र कंपनीही आपल्या सोबत असून सर्वांच्या चर्चेतुन योग्य तो निर्णय तुमच्या मनाप्रमाने 2 दिवसात होईल असे सूचक वक्तव्यही रणजीतसिंह यांनी यावेळी केले.
माढ्याबाबत दोन दिवसातच निर्णय घेऊ : रणजीतसिंह निंबाळकर
RELATED ARTICLES