Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडी‘न्यू फलटण शुगर’ येथून सोन्याचा धूर नक्कीच निघेल

‘न्यू फलटण शुगर’ येथून सोन्याचा धूर नक्कीच निघेल

मोळी पूजनाच्या कार्यक्रमादरम्यान विध्वंस शामसुंदर शास्त्री यांनी व्यक्त केला विश्वास

फलटण: आपल्या राज्यातील बहुतांश साखर कारखाने हे राजकारणी मंडळी चालवत असतात परंतु कंपनीचे संस्थापक प्रेमजी रुपारेल हे अत्यंत धार्मिक असून आगामी काळात दत्त इंडिया च्या माध्यमातून न्यू फलटण शुगर वर्क्स, साखरवाडी ता. फलटण येथून सोन्याचा धूर नक्कीच निघेल असा विश्वास विध्वंस शामसुंदर शास्त्री यांनी साखरवाडी ता. फलटण येथील न्यू फलटण शुगर वर्क्स या कंपनीच्या मोळी पूजनाच्या कार्यक्रमादरम्यान व्यक्त केला.
यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र सहकारी बँकेचे संचालक अविनाश महागावकर, महानंद डेअरीचे उपाध्यक्ष डि.के. पवार, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, फलटण पंचायत समितीचे सभापती प्रतिभाताई धुमाळ यांच्यासह पंचक्रोशीतील प्रमुख पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.
यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, राज्यात ज्या वेळी साखर कारखाने सुरू होत होते त्या सुरवातीच्या काळात राज्यात सुरू होणारा हा आपला न्यू फलटण हा कारखाना आहे. 1933 सालापासून तालुक्याने व या कारखान्याने गळीत हंगाम पाहिले आहेत. कारखाना सुरू ठेवण्यासाठी आगामी काळात आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे सहकार्य महत्वाचे आहे. पूर्वी हा सर्व कारखान्याचा परिसर होळ या गावात येत होता, त्यानंतर पिंपळवाडी हे छोटेसे गाव वसले व न्यू फलटण शुगर वर सुरू झाल्यावर या गावाचे नाव साखरवाडी असे झाले न्यू फलटण शुगर मुळेच साखरवाडी गावाची ओळख राज्यात आहे. काही कारणामुळे तालुक्यातील काही संस्था अडचणीत आल्या. थोडा संयम ठेवून आपण सहकार्याची भूमिका ठेवणे गरजेचे आहे. कारखाना कशामुळे बंद झाला या कारणात आम्ही जाऊ इच्छित नाही. एखादी कंपनी दिवाळखोरीत गेल्यावर सप्लायरची देणी द्यायची तसबीस अजिबात नसते. विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या शेतकर्‍यांच्या वतीने एन सी एल टी मध्ये दाद मागितली व शेतकर्‍यांची देणी सप्लायर या कॅटेगरीमध्ये न घेण्याबाबत त्यांनी निर्णय घेतला. ज्या शेतकर्‍यांनी फॉर्म भरले नाहीत त्यांना पण थकीत बिले मिळणार आहेत. परंतु त्यांनी आता अर्ज भरणे गरजेचे आहे. निवडणुकीच्या वेळेस आपण राजकारण करू परंतु संस्थांमध्ये राजकारण नको. असे आवाहन ही श्रीमंत संजीवराजे यांनी केले.
यावेळी दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बाबत अधिक माहिती कंपनीचे व्हॉइस प्रेसिडेंट मृत्युंजय शिंदे यांनी देताना आज साखर ट्रेडिंग मध्ये व इतर उद्योग पाहताना दोन हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल दत्त इंडिया कंपनी करत आहे. आपल्या देशांमधून जी साखर निर्यात होते त्यापैकी दत्त इंडिया ही कंपनी 25 टक्के साखर निर्यात करते. निर्यातीमध्ये सिंगापूर, दुबई, नेदरलँड, श्रीलंका या देशांमध्ये जास्तीत जास्त साखर निर्यात केली जाते. तसेच आपल्या देशांमधील ब्रिटानिया, पार्ले या नामांकित कंपनीला दत्त इंडिया ही कंपनी साखर सप्लाय करते. दत्त इंडिया ही कंपनी साखर व्यवसाय बरोबरच दूध डेरी मध्ये पण कार्यरत असून हमिदवाडा जिल्हा कोल्हापूर येथे दूध डेरी डिलीशिया या नावाने एक लाख लिटर प्रति दिवस संकल्पन करते व त्या दुधापासून दहा मेट्रिक टन दूध पावडर प्रकल्प दत्त यांच्या कंपनीने उभारला आहे. असे स्पष्ट केले.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील बंद पडलेला वसंतदादा सांगली हा साखर कारखाना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून दहा वर्षाकरिता चालविण्यास घेतलेला आहे. सदरील कारखान्यांमध्ये दत्त इंडिया या कंपनीने पहिल्या वर्षी 7 लाख 32 हजार मेट्रिक टन व दुसर्‍या वर्षी 8 लाख 66 हजार मेट्रिक टन इतके करून परिसरातील कारखान्यात बरोबरच ऊस दर देण्याचे प्रयत्न केलेला आहे. पूर्वीच्या काळात साखरवाडी तालुका फलटण येथील न्यू फलटण शुगर कडून दत्त इंडिया ही कंपनी साखर विकत घेत होती. त्यावेळच्या कंपनीच्या 19 कोटी 50 लाख रुपये रकमेचे ठरल्याप्रमाणे साखर न दिल्याने कंपनीचे नुकसान झालेले आहे. त्याबाबत एनसीएलटी म्हणजेच कंपनीला लवादकडे गेल्यामुळे आम्हाला फक्त 650000 इतकेच मंजूर झालेले व उर्वरित रक्कम 19 कोटी 44 लाख इतकी नुकसान झालेले आहे. त्यामुळे जसे तुमचे नुकसान झाले तसेच न्यू फलटण कंपनीने यापूर्वी दत्त इंडिया कंपनीचे नुकसान केलेले आहे. त्यामुळे दत्त इंडिया कंपनीने सदरील कारखाना घेण्याचे ठरवले. एनसीएलटीच्या आदेशा प्रमाणे शेतकर्‍यांची मंजूर झालेली अंदाजे रक्कम 25 ते 26 कोटी त्यापैकी प्रथम 10 कोटी 60 लाख इतकी रक्कम आगामी तीन महिन्यात शेतकर्‍यांना देणेबाबत कंपनीने आश्वासन दिले आहे. त्यासाठी आमच्या कंपनीकडून एनसीएलटीने बँक गॅरंटी घेतलेले आहे व उर्वरित अंदाजे रक्कम 15 कोटी पुढील बारा महिन्यात देणेबाबत एनसीएलटी कोर्टाने आम्हास आदेश दिलेले आहेत.
दत्त इंडिया कंपनीने शेतकर्‍यांच्या सर्व बाबींचा विचार करून एनसीएलटी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे दहा कोटी 60 लाख कारखाना घेतल्यापासून तीन महिन्याच्या मुदत असताना दत्त इंडिया कंपनीने ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे हित पाहत आजपासून दोन दिवसांमध्ये 20 कोटी रुपये ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याचे जाहीर केले आहे. उर्वरित रक्कम हंगाम बंद होण्यापूर्वी बँक खात्यावर वर्ग करत असल्याचे आश्वासन दत्त इंडिया कंपनीमार्फत मृत्युंजय शिंदे यांनी दिलेले आहे. तालुक्यातील ज्या शेतकर्‍यांनी एनसीएलटी कोर्टाकडे आपले अर्ज भरले नाहीत, अशांना थकित ऊस बिलाचा रक्कम मिळणार नाहीत, अशी शंका निर्माण झाली असताना एनसीएलटी कोर्टाने ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या बाजूने महाराष्ट्राचे विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना संपूर्ण अधिकार दिलेले होते. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांनी अर्ज भरलेले नाहीत अशांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कडे संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे शेतकरी व दत्त इंडिया कंपनी मिळून निर्णय घेऊया असे आवाहनही मृत्युंजय शिंदे यांनी केले.
दत्त इंडिया कंपनीने चालू गळीत हंगाम 2019-20 ची एफआरपी बॉयलर प्रतिपदन या दिवशी एक रकमी देत असल्याचे जाहीर केले आहे. परंतु मागील हंगामात इतर साखर उतार्‍यावर चालू गळीत हंगामाची एफआरपी नियमाप्रमाणे 2000 ते 2100 निघत आहे पण दत्त इंडिया कंपनीने आपल्या सर्व ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे हित पाहून फलटण तालुक्यातील असणारे साखर कारखान्याचा ऊस दराच्या जवळपास एक मी देण्याचे ठरवले आहे सदरील बिल एक ते दहा तारखे मधील व त्या पुढील पंधरा तारखेला असे दत्त इंडिया कंपनी देणार आहे तरी जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी आपला ऊस दत्त इंडिया कंपनीच्या न्यू फलटण शुगर वर्क्स या उपकंपनी कडे नोंदवावा असे आवाहन व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular