यात्रेनिमित्त गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी उपलब्ध करून दिला पाण्याचे टँकर
फलटण: फलटण पूर्व भागातील आसू येथील काळभैरवनाथ यात्रा उत्साहाने साजरा करण्यात आली यात्रेनिमितत गावातील ग्रामस्थांना मुबलक पाणी उपलब्ध करून शरयू कारखान्याने पाण्याचे टँकर देवून ऐन उन्हाळ्यात माणूसकिच नात जपल आसू गावचे ग्राम दैवत काळभैरवनाथ यात्रा शांततेत पार पडला ग्राम देवतांचा लग्न सोहळा पार पडला या सोहळ्यास फलटण, बारामती, इंदापूर, माळशिरस तालुक्यातील भाविक मोठया संख्येने उपस्थित होते लग्न सोहळा आटोपल्यावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
त्यानंतर प्रमुख मार्गावरून गुलालाची उधळण करत व पारंपरिक वाद्यांचया गजरात पालखी ची मिरवणुक छबिना पार पडला सासनकाठीची मिरवणूक काढण्यात आली यात्रेत बाल गोपाळासह माहेरवाशीण महिला ग्रामस्थ यांनी आनंद लुटला यात्रेनिमितत आयोजित करण्यात आले लया तमाशा मंडळाचा कार्यक्रम शांतपणे पार पडला.
यात्रेनिमितत कुस्त्यांचा जंगी आखाडा भरवणयात आला रोख दहा हजार रुपये व चांदीची गदा महाराष्ट्रातील नामवंत पैलवान जयदिप गायकवाड याने जिंकली द्वितीय क्रमांकाची कुसती बाबू भुजबळ याने जिंकली मैदानात लहान मोठ्या कुस्ती घेण्यात आली त्यानंतर नाथमंदिरात नाथबाबांचया नावाने चांगभल म्हणत यात्रा संपन्न झाली.
गावोगावी सध्या गाव जत्रांचा हंगाम चालू आहे परंतु निसर्गाची अवकृपा व पिण्याच्या पाण्याचे जलस्त्रोत आठल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.शरयु साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री श्रीनिवास पवार तथा बाप्पूसाहेब व शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा मा. सौ शर्मिला वहिणीसाहेब पवार यांचेकडे मागणी करताच त्यांनी आसू ता. फलटण येथे संपन्न होत असलेल्या काळ भैरवनाथ यात्रे निमित्त टँकरद्वारे मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. मा श्री बाप्पूसाहेब मा सौ वहिणीसाहेब व शरयुचे संचालक मा श्री अविनाश भापकर यांचे आसू ग्रामस्थांनी आभार मानले असून शरयु परिवारास धन्यवाद दिले आहेत.
यात्रा काळात शरयू कारखान्याने जपलं माणूसकिच नात
RELATED ARTICLES