फलटण: दोन महिने पावसाळा सुरू झाला मात्र अद्याप फलटण तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने गणेशोत्सवावर दुष्काळी गडद छाया पसरली असून मंदीचे सावट मोठ्या प्रमाणावर आहे.
गणेशोत्सव म्हणजे एक आनंदी उत्सव असतो तर विघ्नहर्ता असलेल्या गणेशाची सर्वत्र सार्वजनिक व घरगुती प्रतिष्ठापना केली जाते मात्र गेली दोन वर्षे फलटण तालुक्यात भीषण दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला त्यातच यंदा कोल्हापूर, पेण(रायगड),कराड या भागात पूरपरिस्थिती अनेक मूर्ती तयार करणार्या कारखान्यात पाणी घुसल्याने प्रचंड नुकसान झाले आहे, या मुळे यंदा फलटण शहरात गणेश मूर्ती विकणारे व्यापारी खूप कमी आले आहेत तर स्थानिक मूर्ती विक्रेते यांनी दुष्काळी परिस्थिती असतानाच व मूर्तींच्या किंमतीत साधारण 25 ते 35 % वाढ झाल्याने या वर्षी कमी मूर्ती मागवल्याचे स्पष्टीकरण स्थानिक विक्रेत्यांनी दिले आहे.
फलटण तालुका तसा कायमचाच दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो,त्यातच मान्सूनपूर्व पाऊस ही त्या तुलनेत कमी झाला,अगदी नाही म्हणलं तरी चालेल या मुळे शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक गर्तेत आहे तसेच न्यू फलटण शुगर वर्क्स साखरवाडी या कारखाना बंद आहे गतवर्षी गाळपास गेलेल्या उसाचे पेमेंट अजून नाही,तथापी जोड व्यवसाय म्हणून जनावरांना सांभाळून काही शेतकरी दुधाचा व्यवसाय करतात मात्र या वर्षी ओला चारा उपलब्ध नसल्याने अनेक जनावरे बाजारात विक्रीसाठी नेऊन कवडीमोल भावाने विकली त्या मुळे प्रपंच कसा करावा? हा यक्षप्रश्न सर्व फलटण तालुक्यातील शेतकर्यांसमोर आहे तर राज्य सरकारने गतवर्षी फलटण तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर केला मात्र तो लालफितीत अडकला आहे.
अनेक गावे पन्नास पैसे पेक्षा आणेवारी ची कमी आहेत मात्र त्या गावात थोडीफार मदत मिळाली मात्र ती धनदांडगे यांनी काही अधिकार्यांना हाताशी धरून खाल्ली मात्र सर्वसामान्य शेतकरी मात्र या मदतीपासून वंचितच राहिला आहे, या मुळे एकीकडे दुष्काळाने मारले तर दुसरीकडे राज्यसरकार च्या चुकीच्या पद्धतीने अधिकारी यांनी मारले अशी अवस्था झाली आहे त्या मुळे यंदा शेतकरी च संकटात सापडला असल्याने गणेशोत्सव ही संकटात अशी अवस्था फलटण च्या बाजारपेठेची झाली आहे.
फलटण तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने गणेशोत्सवावर दुष्काळी गडद छाया
RELATED ARTICLES