फलटण: पक्ष सोडुन जाणार्याच्या डोळ्यात पाणी बघुन माझ युट्युबही रडल त्यांच्या अभिनया बद्दल त्यांना आँस्कर पेक्षा महाआँस्कर द्यावा,सोळा संसार सांभाळणार्यांना मला शिव्या घातल्या शिवाय झोप लागत नाही. दूध डेअरी विकणार्यांनी आणि ज्यांना पाण्यातल काही कळंत नाही,मी मंत्री पदासाठी पाणी विकले असे शिकवू नये अशी बोचरी टिका छत्रपती उदयनराजे भोसले, जयकुमार गोरे व खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर करीत विधानसभेसाठी पुढील निर्णय दोन दिवसात जाहिर करु असे प्रतिपादन नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण येथे राजे गटाच्यावतीने आयोजित केलेल्या युवा संवाद मेळाव्यात युवकांना मार्गदर्शन करताना रामराजे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, युवा नेते विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा धुमाळ, उपसभापती शिवरुपराजे खर्डेकर, महानंदाचे उपाध्यक्ष डि के पवार, नगरसेवीका सुभद्राराजे नाईक निंबाळकर आदी माण्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, पुर्वीही राजकीय मंडळी राजकारण करत होते मात्र सर्वसामान्य लोक आहे तिथंच राहत होते,1991 ला श्रीमंत शिवाजीराजे यांनी आम्हाला राजकारणात आणले आम्हाला सांगितले की हा तालुका तुम्हाला सांभाळावा लागेल,तेव्हा आम्ही ठरवले की कधीही भांडणार नाही आज रडीचे राजकारण सुरू आहे व विकासाचे राजकारण मागे पडत आहे अशी खंत व्यक्त करुन रामराजे म्हणाले, कंपनी ही नोकरी साठी आणायची असते,दूध डेअरी ही दुध उत्पादक शेतकरी यांना दर देण्यासाठी काढायची असते, माणचे आमदार हे टीका करतात की काय केले ? दूध डेअरी काढली ती कशी काढली हे सर्व माहिती आहे, मागील पाच वर्षे ज्यांनी टीका केली ते भाजपात गेलेत त्यांनी 80 कोटी रुपयांची कर्ज कार्यकर्त्यांच्या नावावर घेतले आहे. सभापती पद हे कंपाऊंड च्या आत आहे. मला पद मिळण्यासाठी ही निवडणूक लढवायची नाही. परंतू चुकीच्या प्रवृत्तींना धडा शिकविण्यासाठी ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत आपणास जिंकायची आहे. जिल्हा व तालुका व मला सुखरूप ठेवायचे असेल तर आपल्याला चूक करून चालणार नाही, विकृत माणसं एकत्र येतात तेव्हा आपल्याला एकत्र राहावे लागणार आहे. आमचं राजकारण त्यागाचं राजकारण आहे. गेली 30 वर्षे अविरत कष्ट केले आहे. काही जणांना रामराजेंना शिव्या घातल्याशिवाय झोप लागत नाही,हा जिल्हा सुखरूप ठेवायचा असेल तर आपला मतदारसंघ सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे,त्यांना पाण्यातल काही कळत नाही, ह्यांच्या हातात जर हा जिल्हा दिला तर त्यांना एक वर्ष पण 11 तालुके संपवायला लागणार नाहीत अशी भितीही रामराजे यांनी यावेळी व्यक्त केली. आ,दीपक चव्हाणांना ज्या दोन वेळेला मताधिक्य मिळाले त्या पेक्षा जास्त ताकदीने आपला उमेदवार निवडून आला पाहिजे.
श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, आपल्या विरोधातील काही चार पाच जणच सोशल मीडियावर टीका करीत असतात त्यांना उत्तर देताना आपण कमी पडत आहे गेल्या 25 वर्षात अत्यंत सुरक्षित राजकारण बघितले आहे, रामराजे हे फक्त फलटण तालुक्याचे नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राचे भगीरथ आहेत
जे रामराजेंच्या वर टीका करतात त्यांचा पाण्याचा संबध फक्त कशासाठी येतो ते पाहणे गरजेचे आहे,विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्या, मालोजीराजेंचा वारसा लाभलेला तालुका आहे, निवडणूक आली की कोणीतरी येतो आणी एक कंपनी विकत घेतली आहे आणि त्या कंपनीत 7000 मुले कामाला लावणार? असा उपरोधिक टोला दिगंबर आगवणे यांचे नाव न घेता लगावला या मुळे असे लोक आता तालुक्यात कुत्र्यांच्या छत्र्या जशा उगवतात तश्या नेते उगवतात,माग एवढं भगदाड पडलंय, सगळं सील झालं आहे.
आता काय तालुक्याला सील करणार का? तालुक्यातील काही व्यक्ती लॉटरी लागून झालेले खासदार आहेत, अटीतटीची निवडणूक कधीच नव्हती आणि नाही आम्ही घरं भरण्यासाठी कधीही राजकारण केलं नाही, कुणीही येईल आणि टिकली मारून जाईल असा हा तालुका नाही, कुणीही कुठं गेलेला नाही, आपली ताकद एकत्र ठेवा, आपली ताकद विरोधानकांना दाखवून द्या
रामराजेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे,तरुणांच्या असंभवचे संभव करण्याची ताकद आहे,ठोका टाकायला आला तर नुसता खाऊन घेवू नका तर त्यालाही टाका,अंगावर कुणाच्या जावू नका पण आला तर त्याला सोडू नका,तुमच्या पाठीशी आम्ही सर्व जण आहेच असे स्पष्ट करीत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
श्रीमंत रघुनाथराजे म्हणाले की,काही वर्षापुर्वी माझ्यावर हिंदुराव ना.निंबाळकरांनी 307 सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता.मी न डमगता याला सामोरे गेलो.माञ यापुढे मी तालुक्याला विश्वजीतराजेंना बहाल करणार असल्याचे सांगितले.
कोणतीही परिस्थिती आली तरी रामराजे विश्वजीतला बाहेर काढतील असा मला विश्वास आहे.यापुढे आम्ही जशाच तसेच उत्तर दिले जाईल.येणार्या काळात रामराजेंच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन रघुनाथराजे यांनी केले तर खासदारकीची निवडणुक ही नुरा कुस्ती होती राष्ट्वादीचा उमेदवार संजय शिंदे परवा रणजितसिंहा बरोबर मुख्यमंत्री यांचेकडे गेल्याचा गोप्यस्फोट करीत ती लोकसभेची निवडणुकही नुरा कुस्ती होती असे सांगत रणजितसिंह यांना खुले आवाहन देत द्या खासदारकीचा राजीनामा व संजीवराजे लढतील राष्ट्रवादी काँग्रेस कडून व तुम्ही लढा भाजपाकडून मग बघू असे सांगितले.
विश्वजीतराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, रामराजेनी गेली 25 वर्ष घेतलेले कष्ट या तालुक्यासाठी केलेला त्याग विसरुन न जाता तालुका चुकीच्या हातात न देता एकदिलाने,युवा वर्गाने राजेगटाच्या पाठीशी ठामपणे उभे रहा. विरोधकांना अंगावर घेण्याची वेळ आलीतरी सर्वात पुढे आपण असु आता एक महीना फक्त राडा अन धिंगाना घाला असे खुले आवाहन पं.स.सदस्य विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थित युवकांन केले.
यावेळी तालुक्यातील अनेक युवक युवतींनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक शुभम नलवडे यांनी केले व आभार पराग भोईटे यांनी मानले.
‘त्यांच्या’ अभिनयाबद्दल त्यांना ऑस्करपेक्षा महाऑस्कर द्यावा: ना.रामराजे
RELATED ARTICLES