फलटण: गेले एक महिनाभर विधानसभेच्या निवडणुकीच्या पाश्वभुमीवर महाआघाडी व महायुतीच्या उमेदवारांनी व नेतेमंडळींनी प्रचारामध्ये राळ उठवत कोणत्याही परिस्थितीत निवडणुक जिंकायचीच असा प्रचार करित संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. तथापि निवडणुक महाराष्ट्रभर असतानाही राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या सातारा जिल्ह्याकडे सर्वांचेच लक्ष होते.तर जिल्ह्यातील एकमेव असलेला राखीव मतदारसंघ फलटणमध्ये प्रतिष्ठापणाला लागली आहे ते विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोघांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.यामुळे आमदार दिपक चव्हाण हट्रीक करणार का दिगंबर आगवणे किमया करणार याची चर्चा सुरु आहे.
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ अनु.जातीसाठी राखीव असुन राष्ट्रवादी कॉग्रेस व महाआघाडीचे उमेदवार म्हणून विद्यमान आ.दिपक चव्हाण हे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हट्रीक करण्याच्या तयारीत तर त्यांच्या विजयाचा वारु रोखण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे उमेदवार दिगंबर आगवणे यांनी जंगजंग पछाडले असुन हा विजय कोण खेचुन आणणार याबाबत शहरासह ग्रामीण भागात पैजा लागल्या असुन कोण म्हणतय दिपक चव्हाण येणार तर कोण म्हणतय दिगंबर आगवणे येणार माञ पहिल्यांदाच ठोसपणे कोणीही सांगत नसल्याने दोन्ही गटातील कार्यकर्ते 24 तारखेच्या निकालाकडे डोळे लावुन बसले आहेत.
देशासह राज्यात भाजपाची लाट आहे या लाटेवर स्वार होण्यासाठी दिगंबर आगवणे निवडुन येणार अशी चर्चा दबक्या सुरु आहे,तर राष्ट्रवादी कॉग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खा.शरचंद्रजी पवार यांनी वयाच्या 80 व्या वर्षी कोणत्याही परिस्थितीत हे भाजपा सरकार उलथवुन टाकायचे या जिद्दीने आपला बालेकिल्ला असलेल्या सातार्यात भर पावसात भाषण करुन एक वेगळी सहानुभूती तयार करित आपला बालेकिल्ला अभेद्य ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.
यामुळे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाची लाट दिगंबर आगवणे यांना तारणार का सहानभुतीच्या शरद पवारांच्या पाठीमागे तालुका राहुन दिपक चव्हाण हट्रीक करणार याची चर्चा रंगु लागली आहे.
विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 10 वर्ष आमदार दिपक चव्हाण यांनि लोकहिताची अनेक कामे केली.तर एक सुसंस्कृत आमदार म्हणून त्यांची एक वेगळी ओळख तालुक्यासह जिल्ह्यात आहे.तर माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिगंबर आगवणे यांनी सामाजिक,शैक्षणिक तसेच दुष्काळी भागातील अनेक गावांना पिण्याचे पाणी देऊन सामाजिक बांधिलकी जपणार्या दिगंबर आगवणे यांच्या पाठीशी जनता उभी राहणार याचा फैसला उद्या गुरुवार दिनांक 24 रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
झालेले मतदान जिल्हा परिषद गटा प्रमाणे – गिरवी येथे 26678,गुणवरे 24138,विडणी 23626,कोळकी 23207,हिंगणगाव 22171,साखरवाडी 21774,तरडगाव 21212 व फलटण शहर 24715 असे मतदान झाले असून उत्तर कोरेगाव च्या दीड जिल्हा परिषदेच्या गटात 26269 असे मतदान झाले असून एकूण 213790 एवढे मतदान झाले असून या मध्ये कोण बाजी मारणार या कडे निकालाची उत्कंठा लागली आहे.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आ.दिपक चव्हाण यांची हॅट्ट्रीक का दिगंबर आगवणे यांची किमया?
RELATED ARTICLES