Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीपूरग्रस्तांसाठी रहिमतपूर पंचक्रोशीची सातशे कुटुंबांना भरीव मदत

पूरग्रस्तांसाठी रहिमतपूर पंचक्रोशीची सातशे कुटुंबांना भरीव मदत

रहिमतपूर: कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील अनेक गावांना अतिवृष्टीमुळे महापुराचा फटका बसल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड व नरसोबाची वाडी हा परिसर पूर्ण जलमय झाला होता. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रहिमतपूर येथील पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा माने – कदम यांनी आपल्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करुन होणारा खर्च पूरग्रस्तांसाठी खर्च केला.
हर्षवर्धन कदम, शिवाजी जगदाळे, मोहन राव, स्वप्नील गुंडला, सुभाष कदम, नवनाथ चिंचोरे, रेणू तोलानी, सुखदा जोशी, संदीप धनवडे, आनंद पवार व पंचक्रोशी परिवारातील सर्व कर्मचारी, विद्यार्थी यांनी आर्थिक योगदान देत रहिमतपूर व परिसरात फेरी काढून पूरग्रस्तांसाठी निधी जमवत पूरग्रस्तांसाठी रहिमतपूर पंचक्रोशीची सातशे कुटुंबांना भरीव मदत करीत एक पाऊल टाकले.
पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्तांना 15 पोती धान्य, सर्व डाळी, गोडेतेल पुडे, बेकरी उत्पादने, बिस्कीट पुडे, मेणबत्या, काडीपेटी या जीवनावश्यक वस्तू बरोबरच, औषधे, ंटी फंगल क्रीम, फिनाईल, खराटे, मॉपस, सॅनेटरी नॅपकीन, डायपर, डेडॉल, साबण, निलगिरी तेल, ओआरएस, टूथपेस्ट, ब्लँकेटस, टॉवेल, इनरवेअरर्स अशा आरोग्यविषयक साहित्याचे कुटुंबाला लागणार्‍या मूलभूत गरजांचे कीटस् करुन घर टू घर पोहचवत आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाची परंपरा कृतीने जपली.पंचक्रोशी परिवारला निरोप देताना पूरग्रस्त महिला भावनिक झाल्या होत्या. त्यांनी आपल्या भावनांना अश्रूंच्या माध्यमातून वाट करुन दिली.
दरम्यान, या मदत कार्यात प्राचार्य डॉ. भाग्यश्री जाधव, बी.व्ही.निकम, जयवंत माने, पी.पी.वावरे, एस.वाय. ढालाईत, बी.एस.भोसले, उपप्रचार्य बी.डी.साळुंखे यासह संस्थेतील कर्मचार्‍यांनी योगदान दिले. स्थानिक नागरीक बापू महाडीक, प्रकाश महाडीक, शिदू पाटील, संजय दुधाळे, राजेंद्र दोडमणी, सुनील जाधव, मनोज मिनचे, गुरु जगदाळे, संजय पाटील, शरीफ मोमीन, तानाजी सावंत, सुनील पोळ, शिवाजी म्हैसाळे यांनी मदत कार्य वाटपात सहकार्य केले.
राख्या बांधून नाती घट्ट केली
या महापूरामुळे आम्ही पुरते कोसळलो. पण ताई, दादा..! तुम्ही देवदूत म्हणून आमच्या घरात आला, भरीव मदत केली हे दातृत्वाचे हात आमच्या पाठीशी सदैव असायला हवेत.
हे नातं अखंड टिकावे यासाठी अर्जुनवाड गावातील वीस पंचवीस महिला एकत्र आल्या आणि त्यांनी प्रत्येकाला राख्या बांधत आपली भावा-बहिनींची नाती अधिक घट्ट केली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular