सातारा ः श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने सज्जनगड येथे आयोजित दासनवमी संगीत महोत्सवाच्या दुसर्या दिवशी औरंगाबाद येथील सुप्रसिध्द संवादिनी वादक गंगाधर देव यांच्या कन्या संगीत अलंकार सौ.राजश्री देव ओक आणि सौ. धनश्री देव देशपांडे यांनी शास्त्रीय रागासह विविध संतांचे अभंग आणि संगीत नाटकातील पदांची सुरेख बरसात करत गायन सेवा समर्थ चरणी अर्पण करुन या महोत्सवातील दुसरे पुष्प गुंफले.
जयजयवंती अणि गोरख कल्याण रागाचे मिश्रण असलेल्या जय जय गोरख रागातील रुपक तालातील बंदिश .. बाजे बधावा घरघर.. सादर करत आपल्या गायनाला सुरुवात करुन ..जा को नावत कामसे.. ही मध्यलयीत आणि तीनातालातील .. रामो लल्ला माँगत.. ही बंदिश आळवली.
अभंगवाणीत ..पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती .. सादर करताना त्याच प्रकारचा.. कानडाउ विठ्ठलू करनाटकू.. सादर करत रामभक्तीला आळवणारे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले .. पैल कोण गो साजणी, उभा कोदंड पाणी .. हा अभंग अतिशय सुरेख सादर केला. गदिमा आणि सुधीर फडके यांच्याकडून देव पावला चित्रपटात सादर झालेल्या.. कौसल्येचा रामबाई, कबीराचे विणतो शेले.. म्हणताना उपस्थितांना रामभक्तीच्या सहवासाचा आनंद मिळाला.
संगीतकार श्रीधर फडके यांनी संगीत दिलेली आणि गयिका आरती अंकलीकर टिकेकर यांनी सादर केलेली समर्थांचीच रचना.. ताने स्वर रंगवावा. सादर होताना समथर्ंानी गाणे कसे गावे, वाद्ये कशी लावावीत,ताना कश्या घ्याव्यात याचे स्पष्टीकरण केलेले पद सादर केले. त्यानंतर माणिक वर्माच्या आवाजातील संत नामदेवाची रचना, जी भीमपलास रागात आहे ती म्हणजे.. अमृताहूनी गोड नाम तुझे देवा.. राजश्रीने सादर करत माणिक वर्मांच्याच आवाजातील गदिमांनी रचलेले .. घननीळा लडीवाळा झुलवू नको हिंदोळा.. सादर करुन संगीत विद्याहरण नाटकातील बालगंधर्व आणि आशा खाडीलकरंानी म्हटलेले सोरठ रागातील बंदिशीवर आधारित .. मधुकर वन वन वन फिरत करत गुंजारवाला ..अतिशय दमदारपणे सादर केले. कट्यार काळजात घूसली या संगीत नाटकातील .. मुरलीधर श्याम, हे नंदलाला.. सादर करुन शुध्द सारंग रागातील शरद जांभेकरांनी आपल्या गायनाने प्रसिध्द केेलेल्या ..चंदनासि परीमळ, आम्हा काय त्याचे .. सादर करत संत तुलसीदासांचे .. जब जानकीनाथ सहाय करे, तब कौन बिघडावे.. अतीशय सुरेखपणे गायले. पं. विश्वनाथ ओक यानी संगीतबध्द केलेल्या ..जेवि तु,प्राण तु,रामा तू विठ्ठला.. सादर करत गवळण प्रकारात .. गोकुळातल्या गवळणी जमवूनी , राधिका कुजवनी नाचते.. सादर केले. संवादिनी साथ करणार्या गंगाधर देव यांनी याच वेळी गदिमांच्या रचनेला पु.ल. देशपांडे यांनी संगीतबध्द केलेल्या गुळाचा गणपती या चित्रपटातील .. इंद्रायणी काठी देवाची आळंदी.. सादर केले. संत चौखामेळा यांचा .. जोहार मायबाप जोहार सादर करत .. रामनाम ज्याचे मुखी , तो नर धन्य तिन्ही लोकी.. .या भैरवीने आपल्या गायन सेवेची सांगता केली.
सौ.राजश्री आणि सौ. धनश्री यांना तबल्यावर साथ पुणे येथील मिलिंद तायवाडे यांनी तर संवादिनीवर साथ स्वत: गंगाधर देव यांनी केली.तर टाळांची साथ माउली टाकळकर यांनी केली. या कार्यक्रमाचे निवेदन सौ. संगीता जोशी यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समर्थ भक्त अजेयबुवा देशपांडे रामदासी व रमेशबुवा शेंबेकर रामदासी यांनी केले.यावर्षी या महोत्सवाला सुरेख ध्वनीमुद्रण आणि ध्वनी व्यवस्था साथ समर्थं भक्त रेणुकादास भोपी रामदासी यांनी केली आहे.
यानंतर समर्थ सेवा मंडळाच्या वतीने सर्व कलाकारांचा सत्कार समर्थ सेवा मंडळाचे वतीने रमेशबुवा शेंबेकर व सौ.रसिकाताई ताम्हणकर यांनी रामनामी,श्रीङ्गळ, पुष्पगुच्छ देऊन केले.यावेळी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.गुरुनाथ महाराज कोटणीस, समर्थं भक्त योगेश बुवा रामदासी,समथर्ं भक्त मकरंदबुवा सुमंत,गोविंदराव बेडेकर,समर्थं भक्त मीनाताई देशपांडे यांचेसह संपुर्णं महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश परदेशातुन आलेले शेकडो समर्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्या दि.23ङ्गेब्रुवारी रोजी मध्यप्रदेशातील देवास येथील भुवनेश कोमकली यांचे उपशास्त्रीय गायन होणार असुन त्यांना संगीत साथ भरत कामत, संवादिनी साथ सुयोग कुंडलकर हे करणार आहेत.
धनश्री आणि राजश्री देव भगिनींच्या कडून रागदारी,अभंग आणि नाट्यगीतांची बरसात ; श्री समर्थ सेवा मंडळ आयोजित दासनवमी संगीत महोत्सव 2019
RELATED ARTICLES