सातारा: जाता पंढरीसी
सुख वाटे जीवा।
महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगत्गुरू संत तुकाराम, संत सोपानदेव महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज या प्रमुख पालख्यांसह अन्य पालख्या पंढरी समीप आल्या आहेत.
शिवाय ऊन, वारा,पावसाची तमा न बाळगता,कोसो अंतर पार करीत विविध ठिकाणाहून शेकडो दिंड्या हरिनामाचा गजर करीत पंढरीत दाखल होऊ लागल्या आहेत.आषाढी एकादशीचा सोहळा शुक्रवारी असल्याने अवघ्या पंढरीचा परिसर हरिनामाने दुमदुमून गेला आहे.
ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हे शब्द कानावर आले की दिंड्यापताका आणि पालखीबरोबर पंढरपुरी मार्गक्रमण करणारे वारकरी नजरेसमोर येतात. सुखा लागी जरी करिसी तळमळ्। तरी तु पंढरीशी जाय एक वेळ्।्।मग तो अवघाचि सुखरूप होशी। जन्मोजन्मीचे सुख विसरशील।्। पांडुरंगाच्या भेटीची आस मनात धरून हरि भजनात दंग होऊन भक्तिरसाची वाट तुडवीत माऊलींचा पालखी सोहळा आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघाला आहे. पंढरीचा पांडुरंग म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. पंढरपुर वारी या वैभव संपन्न परंपरेमागे वारकर्यांची श्रद्धा असून,विठ्ठल भक्तीभोवती वारकरी संप्रदायाची गुंफण झाली आहे.वारीचा भक्ती सोहळा म्हणजे भक्तीचा महापूर अशा शब्दात वर्णन करता येईल. वारकरी पंढरीत एकत्र येतात तेव्हा सर्वांना विठुरायाचे प्रत्यक्ष दर्शन होणे जवळजवळ अशक्य असते अशावेळी भाविक भक्त कळसाचे दर्शन घेतात.
तुका म्हणे मोक्ष देखील या कळस ही वारकर्यांची श्रद्धा असते पंढरी म्हणजे भाविकांची दुसरी काशीच, संत बहिणाबाई म्हणतात,फउदंड ऐकिला, उदंड गाईला।उदंड देखीला क्षेत्र महिमा।्। पंढरी सारखे नाही क्षेत्र कोठे। जरी ते वैकुंठ दाखविले।्।ऐसी चंद्रभागा।ऐसा भीमातीर्। ऐसा विटेवरी।देव कोठे।
ऐसे वाळवंट्।ऐसे हरिकथा।
ठाई ठाई देखा।दिंडी भार्।्।
ऐसे हरिदास्।ऐसे प्रेमसुख
ऐसा नामघोष्। सांगा कोठे
बहेणी म्हणेआम्हा।अनाथा कारण पंढरी निर्माण्। केली देवे।्। पंढरी पोचल्यावर वारकरी पांडुरंगाचे दर्शन घेण्याआधी नामदेव पायरीचे दर्शन घेतात,गरुड खांबाला मिठी मारतात अर्थात मंदिरात प्रवेश करणे अशक्य झाले तर मंदिराच्या कळसाचे दर्शन घेत, मपांडुरंग पांडुरंगफनाम घोष करीत आनंदाश्रु ढाळतात. एकमेकांच्या पाया पडतात कारण पंढरीत प्रवेश करताच माणसाचे ममी पणफएखाद्या पिकल्या फळासारखे गळून पडते. भक्तीचा महिमा गडद करणारी ही पंढरीची वारी कशाचीही तमा न बाळगता पंढरीच्या ओढीणे निघाली आहे. प्रत्येकाची भावना मजाता पंढरीसी सुख वाटे जीवाफअशीच आहे. म्हणूनच तहान भुक हरवून ते निघाले आहेत.ऊन,वारा, पावसाची तमा न बाळगता, अनवाणी अवस्थेत धोतर व अंगावरील कपड्यांचे भान न ठेवता खांद्यावर भगवी पताका घेऊन कधी उन्हातानात तर कधी पावसात ही वारी सुरू आहे.
अवघ्या पंढरीचा परिसर हरिनामाने दुमदुमून गेला
RELATED ARTICLES