सातारा: संपूर्ण राज्यात महापूराने हाहाकार माजला असून सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो कुटुंबे प्रलयांकारी महापूराने उद्वस्त झाली आहेत, पूर ओसरल्यानंतर मात्र रोगराईचे प्रमाण प्रंचड बळावले असून अशा पूरग्रस्त भागातील लोकांच्या आरोग्यासाठी सातारा येथील संजीवन आयसीयू हॉस्पिटल धावून आले आहे.
पूरग्रस्त लोकांच्या आरोग्यासाठी संजीवनच्या टीमने उपयुक्त अशी औषधे, गोळ्या व आरोग्य साहित्य गोळा करून ते सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त पाटण तालुक्यात आज पाठविण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जोपासत आरोग्य सेवेबरोबरच विधायक उपक्रम राबविणार्या संजीवन हॉस्पिटलच्या वतीने सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीवर मात करण्यासाठी संजीवनच्या वतीने आरोग्यसेवा देत जनतेच्या मदतीला धावून जाण्याचा प्रयत्न केला आहे. संजीवन हॉस्पिटलची ही मदत पूरग्रस्त पाटण तालुक्यातील विविध गावात पोहोचविण्यात येणार आहे.
ही लोकोपयोगी मदत पूरग्रस्तांना देताना संजीवन आयसीयू प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन डॉ. संजय कोरडे,मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. उमेश देशमुख संचालक डॉ. रमेश पाटील, डॉ. यशवंत पाटील, डॉ. सुधाकर लावंड, डॉ.सुधाकर बेन्द्रे, डॉ. सुनीता पवार, डॉ. अजय घाडगे, सीईओ डॉ. विजय सुतार, मनोज वाघ, शिवाजी नलावडे आदींसह संजीवनचे कर्मचारी तसेच ई सी एच एस पॉलिक्लीनीकचे कर्नल डी. के गोरे उपस्थित होते.
पूरग्रस्तांच्या आरोग्यासाठी संजीवनचा मदतीचा हात
RELATED ARTICLES