सातारा: बँकिंग फ्रंटिअर्स ही एक राष्ट्रीय स्तरावरील अग्रणी मल्टी प्लॅट फॉर्म मीडिया कंपनी आहे. त्यांचे माध्यमातून बँकिंग क्षेत्रामध्ये कामकाज करीत असलेल्या संस्थांनी केलेल्या उल्लेखनिय कामकाजाची दखल घेवून पुरस्कार देवून गौरव केला जातो. तसेच बँकिंग क्षेत्रामध्ये होत असलेले विविध तांत्रिक बदल व चालू घडामोडींचा आढावा घेवून बँकिंग फ्रंटिअर्स मासिकांचे माध्यमातून माहिती बँकांपर्यंत पोहोचविणेचे उल्लेखनिय कामकाज करते .
या संस्थेमार्फत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस उत्कृष्ठ कर्जवाढ नियोजन (इशीीं उीशवळीं ॠीेुींह) व सर्वोत्तम पायाभूत सुविधा (इशीीं खपषीर्रीींीीर्लींीीश झश्ररप) असे दोन पुरस्कार गोवा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यांत आले .
गोव्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांचे वतीने व सहकार व सांस्कृतिक मंत्री गोविंद गौडे यांचे शुभहस्ते तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे, बँकिंग फ्रंटिअर्स समूह प्रकाशक बाबू नायर, संपादक मनोज अग्रवाल व भरत सोळंकी यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये हे पुरस्कार बँकेचे संचालक प्रकाश बडेकर, राजेंद्र राजपुरे, राजेश पाटील(वाठारकर), व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, व्यवस्थापक सुजित शेख यांनी स्विकारला.
यावेळी प्रमोद सावंत यांनी सातारा जिल्हा बँकेचा, देशामध्ये गौरवशाली परंपरा व बँकिंग क्षेत्रामध्ये आदर्श बँक म्हणून विशेष उल्लेख केला. तसेच सतीश मराठे म्हणाले, सातारा जिल्हा बँक सर्वसामान्य ग्राहकांना बँकिंग सेवा व सुविधा त्वरित उपलब्ध व्हाव्यात याकरिता बँक 273 शाखा व 46 विस्तारित कक्षांचे माध्यमातून कृषी सहकारी क्षेत्रात निरंतर कार्य करीत आहे. ग्रामीण विकासाबरोबरच कृषी औद्योगिकरणाचे धोरण बँकेने गतिमान करण्यासाठी विविध योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत.
बँकेने पारंपारिक कृषी पिक कर्ज वाटपामध्ये जिल्ह्याच्या क्रेडीट प्लान मधील आपला हिस्सा गेले अनेक वर्षे 70% चे वर ठेवलेला आहे. बँकेने वेळोवेळी दिल्या गेलेल्या पिक कर्ज वाटपाच्या उदिष्टांची 100% पेक्षा जास्त पूर्तता केलेली आहे. याबरोबरच मध्यम व दीर्घ मुदतीच्या विविध जवळपास 75 कर्ज योजनांची सातत्याने परिणामकारकता व उपयुक्ततता कर्ज वाटप करून केलेली आहे.
याबरोबरच काळाचा वेध घेऊन थेट स्वरूपाच्या जवळपास 35 कर्ज योजना, समाजातील विविध घटकांना, त्यांच्या गरजा ओळखून उपलब्ध करून दिल्या आहेत. याचा परिणाम म्हणून कर्जदाराची निकड व गरज पाहून वेळेत कर्ज उपलब्ध करून दिल्याने बँकेचा नेट एन.पी.ए. 0% राखण्यात बँकेस गेले 13 वर्षे सातत्यपूर्ण यश मिळालेले आहे. या महत्त्वपूर्ण व उल्लेखनीय कार्याची नोंद घेवून बँकिंग फ्रंटिअर्स या देशपातळीवरील जिल्हा बँक श्रेणीतील उत्कृष्ठ कर्जवाढ नियोजन कारीताचा पुरस्कार बँकेस प्रदान करणेत आला आहे.
याबरोबरच बँकेस सर्वोत्तम पायाभूत सुविधा हा पुरस्कार प्राप्त झाला असून सातारा जिल्हा बँकेने गेल्या सात दशकामध्ये मा. संचालक मंडळाच्या अभ्यासपूर्वक दूरदृष्टीच्या ध्येय धोरणांची यशस्वी अंमलबजावणी केल्याने हा पुरस्कार बँकेस प्राप्त झाला आहे. प्रामुख्याने आर.बी.आय., नाबार्ड व सहकार खात्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे सूचनांची अंमलबजावणी करीत बँकेने आजवर गुणवत्तापूर्वक कामकाज केले आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा बँकेने जिल्ह्यात उपलब्ध करून दिल्या असलेची नोंद घेऊन हा पुरस्कार बँकेस प्राप्त झाला आहे.
आदर्शवत व उज्वल परंपरा, पारदर्शक कारभार तसेच उत्कृष्ठ कार्यप्रणाली यामुळे बँकेची ख्याती राज्याबरोबरच देशातही झाली आहे. या पुरस्कारामुळे बँकेच्या नांवलौकिकामध्ये आणखी भर पडली आहे. या वेळी महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून आलेले विविध जिल्हा मध्यवर्ती व राज्य सहकारी बँकेचे व अर्बन बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व अधिकारी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल बँकेचे अध्यक्ष मा.आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले व बँकेचे जेष्ठ संचालक व महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, यांच्यासह सर्व संचालक मंडळ तसेच सर्व व्यवस्थापन प्रतिनिधी, सेवक वर्ग व गटसचिव यांनी अभिनंदन केले.
या पुरस्कारामुळे बँकेचे ठेवीदार, हितचिंतक व सभासद यांनी बँकेच्या गुणवत्तापूर्वक यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले .
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपेचात मानाचा तुरा
RELATED ARTICLES