सातारा : सातारा तालुक्यातील सैदापूर गावाजवळून जाणार्या कण्हेर उजव्या कालव्यावरील पूलीची भिंतीला भगदाड पडले आहे. या पुलावरून सतत वाहतूकिची वर्दळ सुरू असते. कालव्यातील पाण्याच्या प्रवाहामुळे पूल केव्हाही कोसळू शकतो. पाटबंधारे विभागाला माहिती देऊनही अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. दुर्घटना घडली तर पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना सर्वस्वी जबाबदार धरले जाईल. तातडीने या पुलाची दुरुस्ती झाली नाही तर शेतकरी तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा सैदापुर ग्रामस्थांनी बोलताना दिला आहे.
सैदापुर येथील शेतकरी बोलताना म्हणाले की, सुमारे गेले वर्षभर हा पूल धोकादायक स्थितीत असताना शासकीय यंत्रणेने मात्र येथे दुर्लक्ष केले आहे. पूल धोकादायक बनल्याने सैदापूर ग्रामस्थांची दळणवळणाची अडचणं झाली आहे. सहा महिन्यापूर्वी धावडशी परिसरात कण्हेर उजव्या कालव्याच्या पूलावरून ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर .ट्रॉली पुलाबरोबर कॅनॉलमध्ये कोसळली होती .या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेनंतर पाटबंधारे विभागाचा एकही अधिकारी इकडे फिरकला नाही.
सातारा-धावडशी रस्त्यावरून कण्हेर उजवा एक्सप्रेस कालव्या वरील पूल अचानक कोसळला होता. त्यावेळी सुदैवाने कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडली नाही. मात्र पूल कोसळल्याने या मार्गावरील धावडशी, दत्तनगर, भिलारवाडी, सैदापूर पिंपळवाडी व परिसरातील लोकवत्यावरील नागरीकांच्या वाहतूकीचा बोजवारा उडाला होता. त्याची पुनरावृत्ती पुन्हा होण्याची वाट कण्हेर पाटबंधारे अधिकार्यांनी पहाऊ नये.
सैदापुर हा पूल धोकादायक झाला आहे. या पुलावरून ऊस व खाजगी वाहतूक सुरू असते. यावेळी पूल कोसळला तर वहातुक ठप्प होण्याची भीती आहे. कॅनॉलवरील पूल धोकादायक झाल्याची माहिती या परिसरातील नागरिकांनी कण्हेर पाटबंधारे विभागातील अधिकार्यांना कळवून या कॅनॉलमधील पाणी बंद करण्याची विनंती केली होती. मात्र पाटबंधारे विभागातील अधिकार्यांनी याकडे दुर्लक्ष करीत इकडे न फिरकणेच पसंत केले.
सैदापूर गावाजवळ कण्हेर उजव्या कालव्यावरील पूलाला भगदाड ; दुर्घटना घडण्याची शक्यता ; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष
RELATED ARTICLES