सातारा: कोणाला कोणतीही अचडण, समस्या निर्माण झाली की लोक या नाही तर त्या वाड्यावर जातात आणि आपली अडचण सोडवून घेतात. लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि सातारा शहराच्या विकासासाठी दोन्ही राजे नेहमीच सक्षमपणे कार्यरत राहिले आहेत. निवडणूकीपुरती काही भूछत्रे उगवतच असतात. हे काही नवीन नाही. त्यामुळे अशा भुछत्रांना नेहमीसारखा घरचा रस्ता दाखवा आणि गतिमान विकासासाठी कटीबध्द असणार्या आपल्या दोन्ही राजांना भरघोस मतांनी निवडूण द्या, असे आवाहन श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे सातारा लोकसभा पोटनिवडणूकीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सातारा शहरातील गुरुवार परज आणि केसरकर पेठ येथे आयोजिक कोपरासभेत सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक अशोक मोने, स्मिता घोडके, निशांत पाटील, अल्लाउद्दीन शेख, श्रीकांत आंबेकर, अनिता घोरपडे, विजय काटवटे, राजू भोसले, अमोल मोहिते, शकील बागवान, स्नेहा नलवडे, विशाल जाधव, प्रकाश बडेकर, जिल्हा परिषद सदस्य जयवंत भोसले यांच्यासह सर्व आजी माजी नगरसेवकांची प्रमुख उपस्थिती होती.
सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या, पक्ष बदल ही काय नवीन गोष्ट आहे का? यापुर्वी किती जणांनी कितीवेळा पक्ष बदलला आहे. मात्र काही जण स्वत:च्या स्वार्थासाठी पक्ष बदलतात तर, काही जण मतदारसंघाच्या विकासासाठी पक्ष बदलतात. विरोधात राहून मोठमोठी विकासकामे करण्यात अडचणी येतात. निधी मिळत नाही. याउलट सत्तेत असल्यानंतर सर्वप्रकारच्या विकासकामांना तातडीने निधी मिळतो. त्यामुळेच उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांनी भाजप या सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. आता सातारा शहराचा विकास अधिक गतीने होईल आणि सर्वप्रकारची कामे मेडीकल कॉलेज, अजिंक्यतारा शिवसृष्टी, कास धरणाचे उर्वरीत काम यासह सर्व प्रकारचे प्रश्न मार्गी लागतील. दोन्ही राजांची गावकी आणि भावकी कोण असेल तर, ङ्गक्त सातारकर आहेत. त्यामुळे सातारकर घरातल्या उमेदवारांना नेहमीप्रमाणे पाठबळ देतील यात शंका नाही.
विरोधकांकडून अपप्रचार केला जाणार असून तुम्ही 40 वर्षात काय केलं असे ते विचारणार. 40 वर्षात काय केलं हे विचारणार्यांना जनताच उत्तर देईल. अॅडीशनल एमआयडीसी झाली त्यानंतर नवीन उमआयडीसी देगाव, निगडी येथे मंजूर झाली. मात्र शेतकर्यांना त्यांच्या जमीनींचा योग्य मोबदला मिळत नसल्याने हा प्रकल्प रखडला आहे. आता शेतकर्यांवर दबाव टाकून हा प्रकल्प मार्गी लावणे चुकीचेच आहे. सातारा शहराच्या आजूबाजूला सात छोटी मोठी धरणे भाऊसाहेबांनी बांधून घेतली. कास धरणाच्या उंचीवाढीमुळे सातारकरांचा पाणीप्रश्न सुटला आहे. ग्रेड सेपरेटकरचे काम सुरु आहे. कितीतरी कामे झाली आणि असंख्य सुरु आहेत. निवडणूकीपुरते जागे झालेले निवडणूक संपली की पुन्हा घरी जातील आणि परत पाच वर्षांनीच उगवतील. त्यामुळे निवडणूकीपुरते सातारकरांचा कळवळा दाखवणार्यांना चोख प्रत्युत्तर द्या आणि सातारा शहराच्या सर्वांगिण विकासासाठी कमळ चिन्हापुढील बटन दाबून आपल्या हक्काच्या दोन्ही राजांना निवडूण द्या, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी यावेळी केले.
गुरुवार परज येथील सभेत मुस्लीम बांधवांनी सौ. वेदांतिकाराजे यांचा सत्कार करुन बाजपच्या दोन्ही उमेदवारांना समाजाचा जाहिर पाठिंबा दिला तर, व्यापारी संघटानेनेही आपला पाठिंबा दर्शवला. यावेळी माजी नगराध्यक्ष नासीर शेख, सलीम कच्छी, मुख्तार पालकर, हेमंत कासार, वझीर कुरेशी, रशिद सय्यद, अन्वर पालकर, धनंजय पारखी, इंतेखाब बागवान, चंदन घोडके, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणूकीपुरत्या उगवणार्या भूछत्रांना नेहमीसारखा घरचा रस्ता दाखवा: सौ.वेदांतिकाराजे भोसले
RELATED ARTICLES