सातारा: आम्ही जरी राजघराण्यात जन्म घेतला असला तरीसुध्दा जनतेत मिळून-मिसळुन राहणे आम्हाला पसंत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ज्या तडफेने सिंचनाबाबत भाजपा-सेना सरकारने धाडसी निर्णय घेतले त्यामुळे जनतेमधून उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. जनतेने त्यावेळी, महाराज, तुम्ही चुकीच्या व प्रश्न भिजवत ठेवणार्यांच्या बाजूने आहात, जनतेच्या बाजुने आपण असायला पाहिजे,अशी आम्हाला गळच घातली. सर्वसामान्य जनतेबरोबर राहायचे असेल तर राजीनामा देणे गरजेचे होते. त्यामुळे आम्ही लोकहिताचा व्यापक विचार करुन राजीनामा दिला आहे. तीन महिन्यात राजीनामा दिल्याने जनतेमध्ये चीड अजिबात नाही.परंतु आजपर्यंत ज्यांनी आमचा फक्त नावालाच उपयोग करुन घेतला त्यांची चिडचिड होणे स्वाभाविक आहे.तीच चिडचिड-मळमख माजी मुख्यमंत्री आणि माजी राज्यपालांनी व्यक्त केली आहे, त्यात तथ्य काही नाही, असा घणाघाती हल्ला सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपा-सेना व मित्रा पक्ष महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी चढवला.
आ. पृथ्वीराज चव्हाण आणि माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या टिकेला उत्तर देताना ते म्हणाले की, ज्यांनी प्रशासकीय उच्य पदावर काम केले,त्यानंतर लोकसभा सदस्य म्हणून कार्य केले आणि त्यानंतर एका राज्याचे राज्यपाल म्हणून प्रशासकीय प्रमुााचे काम पाहिले असे एक आणि ज्यांनी पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्रीपद, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य आणि महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम पाहिले, अशा दोन जेष्ठ व्यक्तींची अजुनही सत्तेची हाव संपलेली नाही, हे त्यांच्या वक्तवयावरुन स्पष्ट होत आहे, असा टोला श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी लगावला.
आम्ही पावणे पाच वर्षाची टर्म शिल्लक असताना राजीनामा दिला कसा1 याचे या दोघांना फारच आश्चर्य वाटत आहे. त्यांनी आजपर्यंत कार्यकालाची मुदत संपता-संपता राजीनामा देणारी मंडळी पाहितलेली आहेत. त्यामुळे त्यांना आमचा राजीनामा पचनी पडणार नाही, ही जेष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी ज्या पक्षात आहेत त्या पक्षाने आमचा फक्त नावालाच आणि त्यांच्या फायद्यापुरताच उपयोग करुन घेतला. आम्ही मांडलेल्या लोकहिताच्या प्रश्नांना नेहमीच पध्दतशीर बगल दिल्याचा आरोपही श्रीमंत छ.उदयनराजे भोसले यांनी यावेळी केला. त्यांच्या सुमारे चार वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकालात मलकापूरची हद्यवाढ होत परंतु सातारची हद्यवाढ होत नाही, कण्हेर येथे कृष्णा खो-याच्या जागेत फिश हब निर्माण करण्याचा प्रस्ताव असो, लिंब येथे आय.टी.हब उभारण्याचा प्रस्ताव असो, सातारा येथे विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव असो, इतकंच काय विभाजन करण्यात आलेल्या एका कृषी विद्यापीठाचे एक केंद्र कराड किंवा सातारा येथे करण्याचा आमचा प्रस्ताव असो, शासकीय मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव असो,पोवई नाक्यावरील उडडाणपुलाचा प्रस्ताव असो, कास धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव असो, हणबरवाडी-धनगरवाडी योजनेला निधी देण्याचा विषय असेा, त्यांनी कधी नाही म्हटले नाही आणि काही केलेही नाही. त्यामुळे अशा व्यक्तींनी आम्ही लोकाग्रहास्तव,व्यापक लोकहितासाठी राजीनामा दिला हे एक न सुटणारे पडलेले कोडे आहे. त्यांना ते कधी सुटणार नाही. गुळाच्या ढेपेला जसे मुंळे चिकटतात तसे सत्तेला चिकटलेल्यांना आमची भुमिका हजमही होणार नाही. त्यामुळेच त्यांची चिडचिड होत आहे परंतु ते सांगताना मात्र जनतेला चीड आहे, असे सांगत आहेत. त्यांच्या या स्वार्थी विचारांना जनता आणि तीही कराडची व्यापक विचार करणारी जनता भिक घालणार नाही असेही उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
ज्यांच्यामुळे राज्य सहकारी बॅन्केची चौकशी लावण्यात आली आणि त्यामुळे ज्यांचे अनेक नेते अडचणीत आले आहेत, त्या माजी मुख्यमंत्री यांनाच दुसरे जेष्ठ नेते मते द्या, असे आवाहन करीत आहेत.ज्यांनी तुमच्या मुळावरच घाव घातला आहे, तुमचा बुडखा उरण्याची वेळ आली आहे तरी सुध्दा त्यांच्याबरोबर मलाही निवडून आणा असेही ते आवाहन करीत आहेत. त्याचबरोबर ते मी नको महणत असताना तुम्ही न्हाई म्हणायचं नाही असे त्यांना सांगीतल्याचेही ते सांगत आहेत. त्यांची भुमिका पारदर्शी वाटत नाही.त्यामुळे त्यांचे कर्म त्यांच्या पाशी, आम्ही पेरले अणि नाही पेरले तरी उगवणारच आहे. जे ते दोन जेष्ठ नेते आहेत त्यांनी पेरले काय आणि नाही पेरले काय त्यांचे उगवणे मात्र खुटवण्याची व्यवस्था सर्वसामान्य जनतेने केली असल्याने, वैफल्यग्रस्त अवस्थेमधुन ते आमच्यावर नाहक टिका करीत आहेत अशी सणसणीत चपराक देखील श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी लगावली आहे.
लोकहिताचा व्यापक विचार करुन राजीनामा दिला: उदयनराजे
RELATED ARTICLES