मजुरांशी साधला संवाद: आस्थेवाईकपणे केली विचारपूस
पुसेसावळी: श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे नेहमीच सर्वसामान्य जनतेला अभिप्रेत मानून काम करत असतात. शेतकर्यांच्या प्रश्नी तर ते खूप भावनिक होतात. याचाच प्रत्यय मंगळवारी शेनवडी ता. खटाव येथे आला. उदयनराजे यांनी थेट शेतात जाऊन शेतकर्यांशी संवाद साधला.
सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या कराड उत्तरमध्ये प्रचार पदयात्रा सुरू आहेत. या दरम्यान शेनवडी ता.खटाव गावच्या हद्दीत त्यांची रॅली निघालेली असताना एका शेतात बटाटे काढण्याचे काम सुरू होते.
यावेळी उदयनराजे यांनी तात्काळ गाडी थांबवण्यास सांगून ते स्वतः चालत शेतात गेले. उदयनराजे चक्क आपल्या शेतात आल्याचे पाहून शेतकरी व तेथील कामगार भारावून गेले .त्यांनी उदयनराजे यांचे स्वागत केले. उदयनराजे यांनीही शेतकर्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
बटाट्याला दर काय मिळतो परवडतं का तुम्हाला. मी सर्वसामान्य लोकांमध्येच असतो त्यामुळे कधीही काही तुमच्या अडचणी असो, तुम्ही माझ्या कानावर घाला. मी कायम तुमच्यासाठीच कार्यरत आहे ,असेही उदयनराजे म्हणाले. यावेळी उपस्थित शेतकरी व कामगार चांगलेच भारावून गेले. यावेळी धैर्यशील कदम यांनी या परिसरातील शेतकर्यांच्या समस्या उदयनराजेंना सांगितल्या.
यावेळी जितेंद्र पवार, सयाजीराव पाटील, समृद्धी जाधव यांच्यासह भाजप, शिवसेना मित्र पक्ष्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
उदयनराजे थेट शेनवडी येथील शेतकर्यांच्या शेतात
RELATED ARTICLES

