Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीपावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना शासनाने योग्य ती मदत देवून धीर द्यावा :...

पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना शासनाने योग्य ती मदत देवून धीर द्यावा : उदयनराजे

सातारा : अकाली-अवकाळी आलेल्या पाऊस, अतिवृष्टी, पूरस्थिती इत्यादीमुळे ग्रामिण भागात झालेल्या शेती व व्यवसायाचे झालेले नुकसान एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून, नुकसान भरपाईचा कायदा व योग्य ती आर्थिक तरतुद करुन, एका महिन्याच्या आत करण्यात यावी, ईर्मा योजना तातडीने लागु करावी. कोलमडलेल्या शेतकरी-बळी राजाला, शासनाने योग्य ती मदत देवून धीर द्यावा, अशी मागणी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्याचे महामहिम राज्यपाल आणि  मुख्यमंत्री व मुख्य सचिव, यांना केली आहे. या मागण्याची पूर्तता झाली नाही तर, शेतकर्‍यांच्या असंतोषामुळे कायदा-सुव्यवस्थेंचा प्रश्न निर्माण होईल. बळीराजा आमच्या जीवाभावाचा असल्याने, उभ्या महाराष्ट्रातील शेतकरी असंतोषाचे नेतृत्व वेळप्रसंगी आम्हाला करावे लागेल इशारा त्यांनी दिला आहे.शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर उपाययोजना सुचवताना राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, आणि मुख्य सचिव, यांना दिलेल्या निवेदनात श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे की, यावर्षी ऑगस्ट  महिन्यात राज्यातील काही भागात विशेष करुन, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये फार मोठा पूर आला. त्यायमुळे शेती पीकांचे-जनावरांचे व शेतकर्‍यांच्या साधन संपत्तीचे आणि ग्रामीण भागातील 12 बलुतेदार व 18 अलुतेदार यांच्या व्यवसायांचे मोठे नुकसान झाले आहे. या पूरपरिस्थितीचे वेळी सार्वत्रिक निवडणुका लागल्याामुळे नुकसान भरपाईचा प्रश्न अधांतरी राहिला. आता वादळ, चक्रीवादळ, हवामान बदल, यामुळे मान्सूनचा परतीचा पाउस हा मुक्काम करुन राहीला आहे. हातातोंडाला आलेली पिके, ज्वारी,बाजरी, भुईमुग, सोयाबीन, कापूस, आले, बटाटे, कांदा, टॉमॅटो, डाळी, द्राक्षं, डाळींब, केळी, भाजीपाला या सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातबरोबर मिड खरीपाची पिकेही गेली आहेत. पावसाने मुक्काम हलवलेला नसल्याने, सद्यस्थितीत शेतकरी, रब्बीच्या पिकांची मशागतही करु नाही.पश्‍चिम महाराष्ट्रा बरोबरच मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रा, विदर्भातील काही भाग, पूर्ण कोकणपट्टा या भागात खाण्याच्या पिकांबरोबर, उस पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. ज्यााप्रमाणे माणसात रोगराई पसरती, त्यायप्रमाणे पिकांची रोगराई पसरली आहे. ग्रामीण भागातील सर्व छोटे व्यावसायिक एकतर पुराच्या पाण्यात गेले किंवा आर्थिकदृष्टिया ग्रामिण भाग उध्वस्त झाल्याने, त्यांचा धंदा बसला.जी गोष्ट् पिकांची तीच गाई-म्हैशी, शेळया-मेंढ्या आदी जनावरांची झाली. ग्रामीण भाग उध्वस्त झाला आहे. आम्ही दहा वर्षापासून मागणी करत असलेली ईर्मा योजनेची जर अंमलबजावणी झाली असती तर शेतकर्‍यांना मदतीसाठी केंद्र व राज्य सरकारकडे हात पसरावे लागले नसते याकडे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी लक्ष वेधले असून खालीलप्रमाणे कालबध्द उपाययोजना सूचविल्या् आहेत. नुकसान झालेल्या पिकांचा सर्वे एकतर ड्रोनच्या माध्यमातुन करावा अन्यथा गावचे सरपंच व कृषी सहाय्यक यांनी केलेला नुकसान भरपाईचा सर्वे हा गृहीत धरावा. ही कार्यवाही एका आठवडयात पूर्ण करुन घ्यावी. ज्या भागात नुकसान झालेले आहे, त्या भागात बॅन्क, पतसंस्था, इतर संस्था यांची पीक तसेच मुदत कर्जे यांच्यापासून शेतकर्‍यांना कायद्याने मुक्त करावे. प्रतिएकरी कमीतकमी धान्य पिकांसाठी रुपये 30 हजार, आणि कापूस, द्राक्ष, डाळींबे, उस आदी पिकांसाठी एकरी रुपये 60 हजारापर्यंत नुकसान भरपाई शेतकर्‍यांना त्यांच्या खात्यात पैसे जमा करुन द्यावी. सध्या पूर आल्यापासून ते अवकाळी पावसापर्यंत शेती, ग्रामीण भागातील उद्योग उध्वस्त झाल्याने, प्रत्ये क घरटी दोन माणसांना, रोजगार हमी योजनेअंतर्गत त्यांाच्या शेतामध्ये जे जे दुरुस्तीचे काम करण्याची आवश्यकता आहे ती करण्यास सांगावी. ही उपाययोजना जून 20 पर्यंत करण्यास सांगावे, पुढचा खरीप हंगामाचे पीक येईपर्यत ही पध्दत सुरु ठेवावी. जी जनावरे वाहुन गेल्याने, नुकसान झाले आहे त्यांना त्यांच्या बाजारभावाच्या किंमतीप्रमाणे प्रती जनावर रु. 70 ते 80 हजार नुकसान भरपाई द्यावी. पुरामुळे, अवेळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या दुभत्या जनावरांचे 50 टक्केय उत्पारदन कमी झाले आहे आणि कोंबड्या, पिक इत्याादीवर रोगराई वाढली आहे. त्याासाठी शेतकर्‍यांना उत्पान्नाची नुकसान भरपाई करावी.पूर व अतिवृष्टी ने बाधित शेतकर्‍यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि कुटुंबाच्या आरोग्याचा खर्च हा शासनाने कायदा व आर्थिक तरतुद करुन करावा. हातातोंडाशी आलेली पिक गेल्याने, शेतकर्‍यांना कायद्याचा आधार नसल्याने, त्यांचे मानसिक संतुलन बिघडून, आत्मकत्तेकचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यागमुळे एक दिवसाचे विशेष अधिवेशन  ताबडतोब बोलावून, त्यातवर चर्चा करुन, शासनाने झालेल्या. नुकसानीची भरपाई देण्याचा कायदा व आर्थिक तरतुद करुन, शेतकर्‍यांना एक महिन्यामध्ये पूर्ण भरपाई देवून धीर द्यावा.वरील उपायोजनांची अंमलबजावणी झाली नाही तर शेतकर्‍यांचा असंतोष हा कायदा-सुव्यवस्था पाळण्याच्या पलीकडे असेल, त्याावेळी आम्हाला रयतेबरोबर-जनतेबरोबर रहावे लागेल. आता तरी देरसे आये लेकिन दुरुस्त आये या म्हणी प्रमाणे शेतकर्‍यांच्या उत्पन्नाला, अस्मातनी व सुलतानी संकटापासून संरक्षण देण्यासाठी जगातील जपान-अमेरिका-ब्राझिल आदी प्रगत देशाप्रमाणे ईर्माचा कायदा करावा व त्यााची कार्यवाही सुरु करावी. जीवाभावाच्या शेतकर्‍यांबरोबर आम्ही सदैव राहणार असून, त्यांनी धीर सोडू असे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेवटी निवेदनामध्ये नमुद केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular