सातारा: सातारा जिल्हा वैधमापनशास्त्र विभागामार्फत दि. 1 एप्रिल ते 6 नोव्हे. 2019 या कालावधीमध्ये 256 व्यापारी, उत्पादक, डीलर यांची तपासणी करून दोषी आढळलेल्या 200 व्यापारी व उत्पादक कंपन्यांवरती वजनमाप कायदा व नियम भंगाबाबत 200 खटले दाखल करण्यात आले. या खटल्यांपैकी 133 प्रकरणांत पोटी 5 लाख 59 हजार 700 रू इतका महसुल जमा झाला आहे तर वजनेमापे नियतकालीन पडताळणी व मुद्रांकन पोटी 1 कोटी 38 हजार 544 रू इतकी शासकीय फी जमा झालेली आहे, अशी माहिती सहाय्यक नियंत्रक वैधमापनशास्त्र रा.ना. गायकवाड यांनी दिली आहे.
खटले हे प्रामुख्याने पॅकबंद वस्तूंची चठझ पेक्षा ज्यादा दराने विक्री करणे, किमंतीत खाडाखोड करणे, पॅकीगं वस्तूंवर आवश्यक उदघोषणा नसणे, वजनात वा मापात फसवणूक करून वस्तू ज्यादा घेणे, वस्तू वजनात कमी देणे तोलन उपकरणांची अचूकता तपासणीसाठीची प्रमाणीत वजने न ठेवणे, अप्रमाणीत वजन माप वापरणे इ कलमाखाली दाखल केले आहेत. यात प्रामुख्याने सोयाबीन खरेदीदार, वे-ब्रिज उपयोग कर्ते, खते, हार्डवेअर, बि बियाणे, इलेक्ट्रीकल वस्तू, दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ, मद्य इ. विक्रेते, घाऊक, विक्रेते व उत्पादक यांचा समावेश आहे.
ही कार्यवाही सहाय्यक नियंत्रक वैधमापनशास्त्र सातारा जिल्हा रा.ना. गायकवाड यांचे मार्गदशनाखाली एस. बी. सावंत, डी. जी. काबंळे, एल.यू. कुटे, एस. जी. धोपाटे, आर. पी. आखरे विभागीय निरीक्षकांनी केली आहे. ग्राहकांनी वरील स्वरूपांच्या तक्रारीबाबत सहाय्यक नियंत्रक वैधमापनशास्त्र सातारा जिल्हा ऑफिस दूरध्वनी 02162-232143 वरती संपर्क साधावा असे आवाहनही श्री. गायकवाड यांनी केले.
वैधमापनशास्त्र विभागामार्फत दाखल खटल्यांत पाच लाख तर पडताळणी व मुद्रांकनापोटी सुमारे एक कोटी रुपये महसुल जमा
RELATED ARTICLES

