सातारा: आंतरराष्ट्रीय किर्तीचे मानांकन प्राप्त असलेला आणि देश व राज्य पातळीवरील विविध पारितोषकांचा मानकरी ठरलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा यंदाचे सन 2019-20 चा 36 वा गळीत हंगाम बुधवार दि.27 रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे.
हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले व त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमंत छ.सौ. वेदांतिकाराजे भोंसले यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये व कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव दिनकरराव सांवत यांच्या अध्यक्षतेखाली आणि कारखान्याचे ज्येष्ठ सभासद सौ.व श्री.गुलाबराव गणपती किर्दत-करंजे, सौ.व श्री.दिनकर केसू साबळे-शिवथर, सौ.व श्री.हणमंत गणपती कणसे- अंगापूर-वंंदन, सौ.व श्री.मधुकर परशराम पवार-निगडी, सौ.व श्री.संपत ज्ञानू शिंदे- पाडळी, सौ.व श्री.संपत श्रीपती धनवडे-शिवाजी नगर (वेचले), सौ.व श्री.श्रीरंग खाशाबा निकम- अपशिंगे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
यासंदर्भात माहिती देताना कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई म्हणाले की,कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत.छ.शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांचे कल्पक नियोजनातून साखर उत्पादनाबरोबर डिस्टिलरी, इथेनॉल प्रकल्प व सहवीज निर्मिती प्रकल्प असे मुल्यवर्धित उपकमही यशस्वीपणे राबविले जात असून कारखान्याचे कामकाज व्यवसायिक पध्दतीचे असल्यामुळेच कारखान्याची आर्थिक स्थिती मजबूत होत आहे. यंदाचे वर्षामध्ये मोठया प्रमाणावर पाऊस झालेला असल्यामुळे उशिरा गाळप सुरू होत आह.
तरी सदरचा गळीत हंगाम हा यशस्वीपणे संपन्न होणेसाठी कारखान्याने आवश्यक ती उपाय योजना केलेली असून आवश्यक तेवढी ऊस वाहतूक यंत्रणा करारबध्द करून हजर होत आहे. या हंगामात 5.00 लाख मे.टन ऊस गाळपाचे उदिष्ट असून गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण करण्याचा निर्धार संचालक मंडळाने केला आहे.
सदर कार्यकमास ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासद, हितचिंतक, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार या सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यकारी संचालक देसाई यांनी केले आहे.
अजिंक्यतारा साखर खारखान्याच्या गळीत हंगामाचा बुधवारी शुभारंभ
RELATED ARTICLES

