Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडीकर्नाटक सरकार त्या एस.टी.अधिकार्‍यावर कडक कारवाई करणार असल्याची माहिती

कर्नाटक सरकार त्या एस.टी.अधिकार्‍यावर कडक कारवाई करणार असल्याची माहिती

सातारा: कुडाळ (ता.जावली) येथील आशिष नायकवडी या महाराष्ट्र राज्यातील मेढा आगारातील एस टी. बस चालकाला कर्नाटक राज्यातील एका गावात एस टी वाहकला बस मध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे दरम्यान, या घटनेची पुन्हा पुनरावृत्ती झाल्यास कर्नाटक एस. टी. महामंडळाची एकही बस सातारा जिल्हयात येऊन देणार नाही असा इशारा जावळीकरांनी व काही शिवसैनिकांनी दिला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, महाराष्ट्र राज्यातील जावली तालुक्यातील एस टी च्या मेढा आगारचे वाहन चालक आशिष नायकवडी हे मेढा-विजापूर ही एस.टी. बस घेऊन कर्नाटक राज्यात गेले होते. आज सकाळी त्यांनी कर्नाटक राज्यातील एका गावामध्ये प्रवासी घेण्यासाठी बस थांबवली असता तेथे उपस्थित असणार्‍या कर्नाटक एस. टी. महामंडळाच्या वाहतूक नियंत्रकाने महाराष्ट्र एस. टी. महामंडळाच्या बसमध्ये चढून प्रवासी घेण्याच्या कारणावरुन आशिष नायकवडी यांना धक्काबुक्की केली. त्यांना अपमानास्पद वागणूक दिली असल्याचे चित्रीकरण पाहून महाराष्ट्रीय माणूस संतापला आहे.वाहन चालक असलेल्या जावलीतील नागरिकांची कॉलरला धरून त्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न केला.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कर्नाटक येथील एका सामाजिक कार्यकर्त्यानी व्हायरल केली होती. त्यानंतर कॉलर उडवणारे माजी खासदार व विध्यमान आमदार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, मेढा एस. टी. बसस्थानक आगारातील चालक-वाहक यांनी कर्नाटक एस. टी. महामंडळाच्या वाहतूक नियंत्रकाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी बाबत कोणीही मत व्यक्त करण्याचे धाडस केले नाही. याचे सर्वत्र नवल वाटू लागले आहे. राज्यात राजकीय घडामोडी वेगाने घडल्या आहेत.भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवारांनी काल सकाळी उठून सरकार स्थापन करण्याचा दावा केला व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवारांनी शपथविधी करून ते सिध्द केले आहे.
त्यानंतर सातार्‍यातील काही निवडून येणार्‍या भाजपाचे आमदारांनी मुबंई गाठली आहे.जावळीतील वाहन चालक मारहाणीचा प्रश्न उपस्थित करून त्याबाबत विश्लेषण करण्याचे प्रयत्न कोणी करू शकत नाही. सध्या मंत्रिमंडळ हाच महत्वाचा भाग ठरला असल्याने अनेक जावळीकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, जावळीच्या अस्मितेसाठी आंदोलन करण्यात येईल असा इशारा सायगाव ता. जावळी येथील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र जगताप,संजय पवार, यांनी दिला आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular