सातारा: सातारा -पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोल नाका चुकवण्यासाठी अनेक जड वाहतुक करणारे वाहक पर्याय म्हणून वाठार – सातारा रस्त्यावर मार्गक्रमण करतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होवून प्रवाशांचे हाल होतात. पण पोलिसांच्या दुर्लक्षितपणामुळे अपघातालाही निमंत्रण मिळत असल्याचे उघड होत आहे.
सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. तरीही मोठ्या प्रमाणात टोल वसूल केला जातो. त्यामुळे चालकांना दुहेरी नुकसान सहन करावे लागते. यावर उपाय म्हणून काहींनी वाठार स्टेशन ते सातारा या मार्गाची निवड करून टोल वाचवण्यासाठी युक्ती काढलेली आहे. परंतु रस्त्याची मर्यादा आणि वाढत्या वाहनामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. सध्या या रस्त्याच्या दुरूस्तीच्या नावाखाली संबंधित ठेकदार काम उरकून बिल मिळवण्यासाठी घाईघाईने काम करत असून ज्यावेळी वाहतूक जास्त असते त्याचवेळी डंपर आडवा लावून रस्ता अडवला जातो. काल दुपारी लांब पल्याच्या एस.टी बसेच रस्त्यावर आडवून ठेवण्यात आल्या होत्या. यातून रूग्णवाहिकासुध्दा सुटू शकलेली नाही. या रस्त्यावरील वाठार स्टेशन आणि महामार्गावरील वाढे फाटा या ठिकाणी वाहतूक शाखेचे पोलिस कर्तव्यदक्षतेने काम करतात. वाठार स्टेशन येथून कोणत्या वाहनाची तपासणी केली आहे. त्या वाहनाची माहिती वाढे फाटा येेथील वाहतुक पोलिसांना सांगण्यात येते. या ठिकाणी सदरचे वाहन आल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून वाहन चालकाला समाधानाने सोडले जाते. पण या रस्त्याच्या कोंडीमुळे कोणीही फारशी दखल घेत नाही. सध्या रस्त्याचे काम कासवगतीने होत असून जी यंत्रणा विना कष्टाचे हप्ते घेतात. तेवढे टक्के तरी त्यांनी प्रामाणिक काम करावे अशी माफक अपेक्षा अनेक परप्रांतीय वाहनचालकांनी केली आहे.
सातारा – वाठार रस्त्यावरील वाहतूक कांेंडीने प्रवाशांचे होतात हाल; पोलिसांचे दुर्लक्ष
RELATED ARTICLES