सातारा (अजित जगताप): अनेक आठवणी साठवून ठेवायच्या असतील तर त्याचे साक्षीदार हे पत्र तसेच छायाचित्र प्रामाण्य मानले जाते. अलिकडच्या काळात पत्र हरवले आहे. ती जागा आता मोबाईने घेतलेली आहे. पण पती ते मुख्यमंत्री हा 25 वर्षांचा प्रवास फक्त एकाच फोटोत अवतरल्याची किमया छायाचित्रकांनी केलेली आहे.
आज महाराष्ट्र सरकारच्या महाआघाडीच्या विश्वासदर्शक ठराव्याच्या वेळेला 169 मते मिळूवन विश्वास दर्शक ठराव मंजूर झाला. आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अभिनंदनासाठी विधानभवनात गर्दी ओसांडून वाहू लागली. 25 वर्षांपासून मित्र असलेल्या भाजपाच्या सदस्यांनी सभात्याग केला. पण 25 वर्ष साथ देणार्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची पत्नी सौ.रश्मी ठाकरे यांनी या गर्दीतही आपले पती व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे अभिदनंदन करून हस्तांदोलन केले. यावेळेला आमदार आदित्य ठाकरे यांनी हा कौतुकाचा क्षण डोळ्यात साठवून ठेवला. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या पाठीमागे एक स्त्री असते. हे जगाने पाहिले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुविद्य पत्नी मीनाताई ठाकरे तथा शिवसैनिकांसाठी मातोश्री असलेल्या मीनाताईंनी आयुष्यभर शिवसेनाप्रमुखांना साथ दिली. एक आगीचा गोळा ज्यो पेटला तर कधीही विझत नव्हता. तर दुसर्या बाजूला मीनाताईंच्या रूपाने थंड बर्फाचा गोळा वातावरणामध्ये शीतलला निर्माण करीत होता. आज दोन्हीही हयातीत नाहीत. घरातील वडिलधार्या माणसांची साथ नाही. अशा वेळेला एकमेकांना आधार देण्याची भूमिका घेवूनच ठाकरे कुटुंबिय समाजसेवा व राजकारणाचा वसा पुढे घेवून जात आहेत.
मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे तसे शांत स्वभावाचे आहेत.
आक्रमकता दाखविण्यापेक्षा ती कृतीतून त्यांनी सिध्द केली आहे. ठाकरे घराण्यातील कोणत्याही व्यक्तीने सार्वत्रिक निवडणूक लढवली नाही. पण उध्दव ठाकरे व रश्मी ठाकरे यांनी आपला सुपूत्र आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभा मतदार संघातून आमदार करून ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती विक्रमी मतांनी विजयी करण्याचे शिवसैनिकांचे स्वप्न साकार केले आहे.
खर म्हणजे मुख्यमंत्र्यांचे देशविदेशातून अभिनंदन करण्यात आलेले आहे. पण खर्या अर्थाने सौ. रश्मी ठाकरे यांनी केलेले अभिनंदन व ते नम्रपणे स्विकारणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी खर्या अर्थाने एका स्त्रीचा गौरव केला आहे.
स्त्रीयांना शिक्षणाचा हक्क देणार्या म.फुले यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री पदाची शपथविधी घेवून महाआघाडीने युगपुरूषांच्या विचारालाच अभिवादन केले आहे.
पती ते मुख्यमंत्री हा प्रवास फक्त एकाच फोटोत अवतरला
RELATED ARTICLES