सातारा : अरे तू मोहन कदम ना..अरे किती बदलला आहेस, तुला ओळखलच नाही, अरे तुझ्या डोक्यावरचे केस कुठे गेले.. अनिल जाधव अजून किती फिट दिसतोस तुझ्यात काय बदलच झाला नाही. अलका, सुजाता, संगिता तुम्ही काय होतात काय झालात ओळखताच येत नाही असे विविध धक्कादायक विधान आपसुक तोंडातून बाहेर पडत होते. कारण तब्बल 37 वर्षांनंतर दहावीच्या बॅचचे विद्यार्थी एकमेकांची गळाभेट घेत होते.
औंघ येथील श्री श्री विद्यालयामधील 1982 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा चांगलाच रंगला होता. यावेळेस प्रत्येकाच्या चेहर्यावर आनंद ओसांडून वाहत होता. प्रत्येकाने शाळेचे वर्ग फिरून पाहिले व आज पुन्हा एक दिवस विद्यार्थी बनून एकमेकांच्या खोडया काढुयात ! विद्यार्थी दशेत एकमेकांनी कशी खेचली होती. टॉपर कोण होता. मागच्या बेंचची मंडळी कोण होती. कोण-कोण शिक्षकांचा मार खात होत, कोणते शिक्षक विद्यार्थी प्रिय होते तर त्यावेळी कडक असणारे शिक्षक ही आता कधी भेटतात याची आस या विद्यार्थ्यांना लागली होती. कोण व्यापारी झाला होता तर कोण डॉक्टर तर कोण अन्य काही परंतु जेथून सर्वांची सुरूवात झाली त्या छताखाली सर्वजण आपआपली पदे विसरून एकमेकांना अक्षरश: लहान मुलागत मिठ्या मारत होता तर आपले गुरूजन भेटताच आदाने पाया देखील पडताना हे विद्यार्थी वर्ग दिसत होता.
सुरूवातीला दिवंगत गुरूजन तसेच दिवंगत वर्गमित्रांना श्रध्दांजली वाहण्यात आली. परशुराम पुराणिक सरांनी गणेश वंदना गायिली तर सर्व माजी विद्यार्थ्यांनी 37 वर्षानंतर वंदन तुज शारदेस ही शाळेचे प्रार्थना सामुहिकपणे गायिली. यावेळी परशुराम पुराणिक, नारायण जोशी, पद्मा देशपांडे, नारायण पोळ, बाळकृष्ण देशमुख, प्रदिप कणसे, संजय घाडगे, निकम या सर्व गुरूजनांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अनिल जाधव, दिपक कदम, सुरेखा पवार, मोहन कदम, डॉ.भगवान माळी या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तर गुरूजनांनी या सर्व माजी विद्यार्थ्यांना आज तुम्ही मिळवलेले यश पाहून आम्हा गुरूजनांना जो आनंद झाला आहे. तो शब्दात व्यक्त करता येत नाही असे सांगताना अनेक शिक्षक भावुक झाले होते.
या कार्यक्रमाला दिपक कदम, नंदकुमार घार्गे, नाथा राऊत, रमेश देवळे, अमोल जाधव, अजित रजपुत, उमेश माळी, दिलीप यादव, युवराज पवार, अर्जुन माळी, संजय कारंडे,अंबादास पोतदार, दिलीप यादव, आनंदा ननावरे, डॉ.भगवान माळी, राजेंद्र देशमुख, संजय इंगळे, संजय वंजारी, विष्णू पवार, सुरेखा पवार, अलका फडणीस, सुजाता घार्गे, संगीता खोचीकर, आदी उपस्थित होते. आभार राजेंद्र देशमुख यांनी मानले.
असा रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा श्री श्री विद्यालय औंधच्या 1982 च्या विद्यार्थ्यांनी गाजवल्या आठवणी
RELATED ARTICLES