सातारा : लोणंद येथील भारत गिअर्स लि.या कंपनीसह जिल्ह्यातील सर्वच कंपन्यात व्यवस्थापणाकडून कामगारांवर अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ प्राणांतिक उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे यशवंत भाऊ भोसले यांनी या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने न्याय द्यावा अशी मागणी करत पोलीस संबधितांवर कारवाई करत नसल्याचा आरोप केला.
कंपनीच्या व्यवस्थापनात बाहेरचे लोक जास्त असून त्यांनी काही गुंड पाळले आहेत. त्या गुंडाकडून स्थानिक कामगारांच्या जीवे मारण्याच्या धमक्या देत असून ते घरात घुसत आहेत. पोलिसांनी कामगारांचे जबाब घेऊन अद्यापही कारवाई केली नाही. पोलिसांकडून धमक्या देणार्या गुंडांवर कारवाई न झाल्यास रविवार दि. 8 पासून सर्व कामगार आपल्या कुटूंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक आंदोलनास बसणार असून पुढील होणार्या घडताना सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहणार असल्याचा इशारा यशवंत भाऊ यांनी दिला.
यशवंत भोसले म्हणाले, लोणंद एमआयडीसीतील मे. भारत गिअर्स लि. या कंपनीचा एचआर लोकेश कुमार याने कामगारांनी आपल्या न्याय हक्कासाठी युनियन केली असता युनियनमधील कामगारांना लोकेश कुमार यांनी काही गुंडाकरवी धमकी देण्यास सुरुवात केली.
काही गुंड या कामगारांच्या घरात घुसले आहेत. तर कामगारांना या युनियनचा राजीनामा द्या, नाहीतर मुंब्रा आणि फरिदाबाद येथे कंपनीत तुमची बदली करू अशी धमकी देत पत्रावर जबरदस्तीने सही घेण्याचा प्रयत्नकेला होता. याबाबत जिल्हाधिकारी आणि अप्पर पोलीस अधीक्षक याना भेटून निवेदन देण्यात आले. त्यांनी कारवाईचे आदेश संबंधित विभागाने दिले. असे असताना रविवारी लोणंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि फलटण डीवायएसपी यांनी 45 कामगारांचे जाब-जबाब घेतले. मात्र आता गुंडांवर कारवाई करण्यासाठी पोलीस साक्षीदार लागणार असे सांगून हातावर करत आहेत. त्यामुळे आता सातारा बिहार होतोय कि काय? अशी भीती निर्माण झाली आहे. पोलीस नक्की का गप्प बसलेत? त्यांनी गुंडांवर कारवाई करणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्यानंतर आज बुधवारी सहाय्यक कामगार आयुक्तांनी याबाबत बैठक बोलवली होती. मात्र, त्या बैठकीलाही भारत गिअर्स लि.या कंपनीचे व्यवस्थापन हजर राहिले नाही. त्यामुळे कामगार आयुक्तांनी बोगस अक्ट, ट्रेनींग झालेल्याना नोकरीत कायम करणे यासह अन्य मागण्याचे पत्र पाठवण्यात आले असून पुन्हा शनिवार दि. 7 रोजी पुन्हा बैठक बोलवण्यात आली आहे. त्याबैठकीत कामगारांच्या हिताचे आणि गुंडांवर कारवाई न झाल्यास रविवार दि. 8 पासून सर्व कामगार आपल्या कुटूंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक आंदोलनास बसणार असून पुढील होणार्या घडताना सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कामगारांचा प्राणांतिक उपोषणाचा इशारा भारत गिअर्स प्रकरणी पोलीस कारवाई करत नसल्याचा यशवंत भाऊ भोसले यांचा आरोप
RELATED ARTICLES