सातारा : लोणंद एमआयडीसीतील भारत गिअर्स कंपनीत कामगार युनियन केल्याप्रकरणी कंपनी व्यवस्थापनाने कामगारांवर दबाव आणला होता. युनियन सोडून कामगावर हजर रहा अन्यथा बडतर्फ करू, असा इशारा नोटीसीद्वारे कामगारांना देण्यात आला होता. याविरोधात युनियनच्या कर्मचार्यांनी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली आहे. यावर न्यायालयाने कर्मचार्यांना बडतर्फ करता येणार नाही तसेच इतर कोणत्याही शाखेत त्याची बदली करता येणार नाही, त्यांना सोमवार पासून कामावर जाण्याचा निर्णय दिला असल्याने कामगारांना दिलासा मिळाला आहे.
भारत गिअर्स कंपनीच्या विरोधात युनियन केल्याने कंपनीने युनियनच्या कर्मचार्यांवर गुंडाकरवी दबाव आणला. यावर प्रशासनास भेट घेऊन न्याय मिळेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण युनियनच्या कर्मचार्यांनी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतुत्वाखाली सुरु केले. कर्मचार्यांनी युनियन न करता कंपनीत कामावर हजर व्हावे अन्यथा बडतर्फ केले जाईल. युनियन न सोडल्यास इतर शाखेत बदली करण्याची नोटीस दिली होती. याविरोधात कर्मचारी युनियनने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाची शनिवारी सुनावणी झाली असून याबाबत न्यायाधीश सी. एस. दातीर यांनी कंपनीला कर्मचार्यांनी युनियन केली म्हणून कामावरून बडतर्फ करता येणार नाही. तसेच त्यांची बदलीही करता येणार नाही, असे स्पष्ट सांगितले. तर त्यांना सोमवार पासून कामावर जाण्याचा निर्णय दिला असल्याने कामगारांना दिलासा मिळाला आहे. कामगारांच्या बाजूने युक्तिवाद अॅड. रवींद्र जाधव यांनी केला आहे.
भारत गिअर्सच्या कामगारांना दिलासा
RELATED ARTICLES

