Thursday, June 26, 2025
Homeठळक घडामोडीसरकारच्या नोटबंदी, जीएसटी धोरणामुळे जनतेची होरपळ

सरकारच्या नोटबंदी, जीएसटी धोरणामुळे जनतेची होरपळ

लोकसभा निवडनुकीत मतदारांनी विचारपुर्वक मतदान करावे; उदयनराजे भोसले
कराड : गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने जनतेला दिलेल्या आश्‍वासनाची पुर्तता केलेली नाही. नोटाबंदी जी.एस.टी. मुळे उद्योजक, व्यापारी, तसेच लहान व्यवसायिकांचे उद्योग रसातळाला गेले आहेत. तसेच सर्वसामान्य नागरिकांची होरपळ झाली आहे. तेंव्हा होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांनी विचारपुर्वक मतदान करून परिवर्तन घडवावे. असे अवाहन सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी-काँग्रेस, मित्रपक्षाचे उमेद्वार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.
स. गा. म महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, महिला महाविद्यालय येथिल विद्यार्थी – विद्यार्थींनींशी उदयनराजे यांनी संवाद साधला त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. मोहनराव कदम, आ. आनंदराव पाटील, सत्यजीत पाटणकर विश्‍वजीत कदम सारंग पाटील, मनोहर शिंदे अजितराव पाटील. देवराज पाटील, राजेंद्रसिंह यादव यांच्यासह राष्ट्रवादी- काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
उदयनराजे भोसले म्हणाले, आपल्या देशात लोकशाही आहे. कोणी उभे रहावे याला बंधन नाही मात्र मतदारांनी चंागले वाईट ओळखुन मतदान केले पाहिजे तरच लोकशाही जिवंत राहील गेल्या निवडणुकीत भाजपने आश्‍वासनांची बरसात केली अनेक माध्यमांचा त्यंानी वापर केला. मात्र गेल्या पाच वर्षातील केंद्रातील भाजप सरकारचा कारभार पाहता. त्यांनी जनतेची चक्क फसवणुकच केल्याचे दिसत आहे. आज नोटा बंदी जी. एस.टी. मुळे सर्वजन भरडले गेले आहेत. अनेक उद्योजकांची वाताहत झाली आहे. तेंव्हा या निवडणुकीत मतदारांनी परिर्वतन घडवावे.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. केंद्रातील मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने देशभरातील जनतेची घोर निराशा केली आहे. भाजप सरकार लोकशाही सोडुन हुकुमशाहीने कारभार चालवत आहे. मागील निवडणुकित दिलेली आश्‍वासने त्यंानी पाळली नाहीत. शेतकर्‍यांबरोबरच उद्योजक व्यापारी, नागरिक आज मोठया संकटात सापडले आहेत. या परिस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी परिवर्तन झाले पाहिजे. ते या निवडणुकीच्या माध्यमातुन झाल्याशिवाय राहणार नाही.
होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सर्व समविचारी पक्ष एकत्र आले आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहित. सर्वांचे एकच ध्येय आहे. देश वाचविणे तसे घडले नाहीतर तिथुन पुढे देशात निवडणुकच काय लोकशाही ही नांदणार नाही तेंव्हा प्रत्येक सुज्ञ मतदारांने याचा विचार करावा.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular