सातारा: ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी लेखक विचारवंत व्याख्याते चाणक्य मंडळाचे प्रमुख अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते सोनगाव येथे यशेंंद्र क्षीरसागर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. धर्माधिकारी यांचे स्पर्धा परीक्षा या विषयावर व्याख्यान देखील झाले. स्वतःच्या गावात झालेला पहिला सत्कर असून या सत्कारामुळे मी भारावून गेलो आहे, अशी प्रतिक्रिया श्री. क्षीरसागर यांनी व्यक्त केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सरपंच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्षीरसागर यांचे आत्तापर्यंत कार्य लक्षात घेऊन माझी शाळा ग्रुप तर्फे सत्कार करण्यात येत असल्याचे नियोजन समितीचे प्रमुख विजय जाधव यांनी सांगितले. सागर यांनी आत्तापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना मोफत व्याख्याने दिली आहेत. महिला मंडळे ग्रामस्थ अशा घटकांसमोर अनेक व्याख्याने देऊन जनजागृती केली आहे. सदर 25 तास अध्यापन करून त्यांनी विश्वविक्रम केला आहे. त्याची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. तसेच भारतातील सर्वात मोठी दीर्घ कविता भारतीय संस्कृती त्यांनी लिहिली असून त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. ही कविता 3000 ओळींची आहे संस्कृती कला म्हणजे या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी माणिक उपक्रम यशस्वी केले आहेत.
सांख्यिकी विस्तार अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या सूत्रसंचालन यशस्वीरित्या केले आहे. त्यांचे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध असून त्यांना यापूर्वी ग्रंथमित्र शिवाजीराव चव्हाण संशोधन पुरस्कार प्राप्त झाला आहे. अनेक वर्तमानपत्रे मासिके यातून त्यांनी लेख लिहून प्रबोधन केले आहे.
यशेंद्र क्षीरसागर यांचा सोनगावमध्ये जाहीर सत्कार
RELATED ARTICLES