सातारा : सातारा शहराला कचरा सफाईची सेवा देणार्या घंटागाडी चालकांच्या वेतनाचा प्रश्न चिघळला आहे. शहरातील 42 घंटागाडी चालकांच्या वेतनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याने चालकांनी 15 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद जिल्हाधिकारी कार्यालयावर सुरू केला. त्यामुळे शुक्रवारी सातारा शहरात तब्बल चाळीस टन कचरा पडून राहिल्याने शहराची आरोग्य व्यवस्था कोलमडली.
कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत व गणेश भिसे यांच्या नेतृत्वाखाली घंटागाडी चालकांनी चक्क त्यांची वाहने जिल्हाधिकारी कार्यालयावर आणून उभी केली. मात्र पहिल्या दिवशी प्रशासन व घंटागाडी चालक योच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाने बेमुदत बंदचा इशारा दिला होता आणि त्याची अंमलबजावणी सुध्दा लगोलग झाली. सातारा शहरात शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून एकही घंटागाडी धावली नाही. सर्व घंटागाडी चालकांनी आपल्या वाहनांसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत ठिय्या दिला. सातारा शहरात आज विविध कार्यक्रमांची रेलचेल असताना चाळीस टन कचरा मात्र पडून राहिला. पालिकेच्या आरोग्य विभागाने मग स्वतः ट्रॅक्टर लावून कचरा उचलायला सुरवात केली.
सातारा शहराच्या स्वच्छतेचा ठेका साशा कंपनीला देण्यात आला होता मात्र करार संपून गेल्यावरही कंपनीने घंटागाडी चालकांना तीन महिन्याचे वेतन अदा केलेले नाही. त्यामुळे कर्मचारी संघाच्या झेंड्याखाली घंटागाडी चालकांनी 9 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले होते. मात्र तरीही प्रलंबित वेतनावर निर्णय न झाल्याने घंटागाडी चालकांनी बेमुदत संप करण्याचा इशारा दिल्याची माहिती संघाचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी दिली जोपर्यंत प्रशासन चर्चेला येत नाही तोपर्यंत आंदोलनात माघार नाही अशी स्पष्ट भूमिका खंडाईत व गणेश भिसे यांनी मांडली. सातारकर जो कर भरतात तो कर योग्य स्वरूपात भरला जावा याकरिता हे आंदोलन करण्यात येत आहे असल्याचे खंडाईत यांनी स्पष्ट केले. काही कारण स्तव सातारकरांची गैरसोय होत असल्याबद्दल खंडाईत यांनी दिलगिरी व्यक त केली.
घंटागाडी चालकांच्या बंदमुळे चाळीस टन कचरा पडून
RELATED ARTICLES