परळी खोर्यातील रस्त्यांवर जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण…?
परळी: (अल्पेश लोटेकर) रिलायन्स जिओने परळी खोर्यात धुमाकूळ घातला असून गावांना जोडणार्या मुख्य रस्त्याची चाळण केली आहे तसेच काही ठिकाणी रस्त्यालगत मातीचे ढीगच ढीग तसेच ठेवले आहेत या खोदकामामुळे ग्रामस्थांना प्रचंड गैरसोयीशी पावसाळ्यात सामना करावा लागणार हे तितकेच खरे.
रिलायन्स जिओकडून ग्रामीण भागात इंटरनेट सेवेसाठी केबल टाकण्याचे काम जोरात सुरू होते या कंपनीकडून गजवडी ते केळवली या ठिकाणी केवळ कामे पूर्ण झाली मात्र रस्त्यालगत लागलेले मातीचे ढिगारे तसेच ठेवले येणार्या पावसाआधी सर्व माती रस्त्यावर येणार यात काही शंका नाहीच.
पाणी साचून रस्त्यावर खड्डे निर्माण तर होणारच आणि यामुळे वाहनचालका बरोबर स्थानिकांना ही मोठी कसरत करावी लागणार आहे.अपघात होण्याचे प्रमाण अधिक वाढणार व सदर ठिकाणी जीवितहानी ही होऊ शकते व जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोणाला धरणार आणि यावर संबंधित विभाग कोणती पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या कित्येक वर्षानंतर परळी खोर्यातील रस्तांची थोडीफार दुरुस्ती करण्यात आली परंतु रिलायन्स जिओ कंपनीच्या खोदकामामुळे पुन्हा रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्यातच कामगारांच्या निष्काळजीपणामुळे कुस-खडगाव या गावांना जोडणारा पूल हा आधीच धोकादायक स्थितीत असतानाच कंपनीच्या मशिनरीचा धक्का लागल्याने पुलाचा काही भाग पडला आहे म्हणजे एकंदरीतच परळी-केळवली यातील सध्याचा प्रवास म्हणजे डोकेदुखीच असणार आहे.
स्थानिक लोकांना विचारात न घेता केले काम सुरू
परळी खोरे हा भाग निसर्ग सौंदर्यने नटला आहे या भागात पावसाळ्यात हजारो पर्यटक भेट देतात आणि निसर्गाचा आनंद लुटतात परंतु आता रिलायन्स जिओ कंपनीने स्थानिक लोकांना विचारात न घेता केलेल्या रस्त्या कडेला खोदकमामुळे पावसाळ्यात रस्त्याची दैना होणार आहे यामुळे पर्यटनावर देखील परिनाम होणार आहे.
रिलायन्स जिओ केबलसाठी मुख्य रस्त्यांची चाळण
RELATED ARTICLES